रिक्षा भाडेवाढ मिळवली अत्ता कल्याणकारी मंडळासाठी एकजुटीने लढू :- बाबा कांबळे,
महाराष्ट्र रिक्षा पंचायत संस्थापक अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांनी मानले प्रशासनाचे आभार,
शबनम न्यूज :- पिंपरी चिंचवड (दि.१७ नोव्हेंबर ) :- पुणे, पिंपरी-चिंचवड व बारामती या विभागांमध्ये पहिल्या दीड किलोमीटरच्या टप्प्यास रिक्षा मीटर साठी तीन रुपये भाडे वाढ देण्यात आली असून पुढील प्रत्येक किलोमीटर साठी 14 रुपये करण्यात आलेले आहे. ही भाडेवाढ म्हणजे रिक्षाचालक-मालक यांनी दिलेल्या लढ्याला यश असुन ही एकजुटीने लढा दिल्यामुळे आपण यशस्वी झालो. ज्या पद्धतीने आपण मीटर भाडेवाढीच्या मुद्द्यांमध्ये एकत्र येऊन लढलो त्याच पद्धतीने आता कल्याणकारी महामंडळाच्या मुद्द्यासाठी एकत्र येऊन लढू. यातही आपण विजय मिळवू. भाडेवाढ केल्याबद्दल प्रशासनाचे आभार असे म्हणत बाबा कांबळे यांनी या लढाईचे श्रेय रिक्षाचालक-मालक यांना दिले आहे .
बाबा कांबळे म्हणाले रिक्षा मीटर भाडेवाढ संदर्भात हकीम समिती यांच्या सूत्रानुसार दर एक मे ला आम्हाला भाडेवाढ मिळत होती, परंतु परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या काळात त्यांनी हकीम समितीचा निर्णय रद्द करून खटुआ समिती नेमली. या समितीने देखील भाडेवाढीची शिफारस केली. खटुआ समितीच्या शिफारशीनुसार भाडेवाढ मिळावी अशी महाराष्ट्र रिक्षा पंचायत व इतर संघटनांचे आग्रही मागणी होती, यासाठी महाराष्ट्र रिक्षा पंचायत पुणे शहराध्यक्ष शफिक भाई पटेल उपाध्यक्ष अरशद अन्सारी, कार्याध्यक्ष कुमार शेट्टी, मोहम्मद शेख किरण एरंडे मुराद काजी अन्सारी शेख आयाज शेख विलास केमसे संजय गुजलेकर यांनी वेळोवेळी प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांना निवेदन देऊन या विषयाचा पाठपुरावा केला. सर्वांच्या एकजुटीमुळे हा विजय झाला असून ज्या पद्धतीने आम्ही तुटपुंजी भाडेवाढ रद्द करून रिक्षाचालकांची हक्काचे भाडेवाढ म्हणून घेतली याच पद्धतीने रिक्षा चालक मालकांनी आता महाराष्ट्र सरकारने रिक्षा चालक मालकांसाठी जाहीर केलेले फसवे कल्याणकारी महामंडळ रद्द करण्यासाठी प्रयत्न करावेत. यासाठी लढा द्यावा आणि परिवहन विभागाच्या अंतर्गत स्वतंत्र कल्याणकारी मंडळ व्हावे यासाठी एकजुटीने लढा द्यावा आणि जाहीर केलेले फसवे महामंडळ रद्द करून घ्यावे यासाठी सर्वांनी एकत्र यावे असे आवाहन देखील यावेळी बाबा कांबळे यांनी केले.
शफिक पटेल म्हणाले प्रशासनाच्या वतीने अत्यंत तुटपुंजे 69 पैसे अशी भाववाढ देण्यात आली होती. काही संघटनांनी या भाववाढीचा स्वागत केलं आणि पेढे फटाके वाजवले. परंतु रिक्षाचालकांना मात्र ही भाडेवाढ मान्य नव्हती. सहा वर्षानंतर भाडेवाढ मिळत होती ती आमचं हक्क किंवा अधिकार याप्रमाणे नाही तर भीक दिल्याप्रमाणे मिळत होती यामुळे रिक्षा चालक नाराज होते .परंतु काही रिक्षा संघटना मध्ये आपापसात मतभेद निर्माण झाल्यामुळे हक्काची मिटर भाडे वाढ मिळण्यास उशीर झाला. परंतु महाराष्ट्र रिक्षा पंचायत संस्थापक अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सातत्याने रिक्षाचालकांची बाजू लावून धरली. हकीम समिती आणि खटुआ समितीच्या सूत्रानुसार आम्हाला भाडेवाढ मिळावे अशा प्रकारची मागणी आम्ही वेळोवेळी प्रशासनाकडे लावून धरली. यामुळे प्रशासनाला माघार घेऊन मीटर दरवाढ रद्द करावी लागली आणि त्यांनी पूर्वी दिलेली तुटपुंजे भाडेवाढ रद्द करून नव्याने भाडेवाढ तीन रुपये भाडेवाढ जाहीर केली आहे. पण मीटर भाडेवाडी सोबतच मीटर कॅलिब्रेशन कामी रिक्षाचालकांची लूट व फसवणूक होऊ नये तसेच मीटर रिपेअर कॅलिब्रेशन हे कमीत कमी दरामध्ये उपलब्ध करून द्यावे याबाबत आम्ही लढा देऊ. पुढील काळामध्ये बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली अजून जोमाने पुणे शहरामध्ये अत्यंत चांगलं काम करू आणि रिक्षा चालक मालकांचे प्रश्न सोडवू असे असे यावेळी शफिक पटेल म्हणाले.