शबनम न्युज | पुणे
आज भोसरी मध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांना सर्वाधिक मतांनी विजयी करण्याची जबाबदारी आपली, असल्याची प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी दिली.
यावेळी बैठकीला आमदार महेश लांडगे, शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार राहुल कुल, हडपसर चे माजी आमदार योगेश टिळेकर, माजी मंत्री बाळासाहेब भेगडे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, जिल्हा परिषद गटनेते आशाताई बुचके, जयश्री परांडे, आबा तुपे, जयसिंह एरंडे, डॉ. ताराचंद कराळे, राम गावडे, संतोष खैरे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना बावनकुळे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जगामध्ये भारताचा आदरयुक्त दबदबा निर्माण झाला आहे. मोदी यांच्या नेतृत्वाला सर्वाधिक पसंती मिळत आहे. राज्यामध्ये महायुती आहे. सगळ्यांच्या विचाराने शिवाजीराव आढळराव यांना शिरूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आपली सगळ्यांची जबाबदारी वाढली आहे. शिवाजीराव आढळराव यांना सर्वाधिक मतांनी विजयी करण्याची जबाबदारी आपली सगळ्यांची आहे, अशा सूचना त्यांनी दिल्या.