शबनम न्यूज / पिंपरी
हिवताप डेंग्यू व चिकनगुनिया या किटकजन्य रोगांना आळा घालण्यासाठी उपाययोजना करण्याचे पिंपरी चिंचवड महानगरपालिका वतीने आवाहन करण्यात आले आहे.
हिवताप हा आजार एनॉफिलस व डेंग्यू चिकनगुण्या हे आजार पसरवण्यास एडिस कारणीभूत असतात. किंवा चिकनगुण्या झालेल्या व्यक्तीस डास चावला तर रोगाच्या रक्तातील डेंग्यू चिकनगुण्याची विषाणू त्या डासाच्या शरीरात शिरतात. असा विषाणूजन्य डास निरोगी माणसाला चावल्यास त्याला हिवताप, डेंग्यू, चिकनगुण्या होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे हिवताप, डेंग्यू, चिकनगुण्या रोगाचा प्रसार थांबवायचा असल्यास एनॉफिलस डासांची उत्पत्ती वर आळा घालावा लागेल. एनॉफिलसअस्वच्छ डासांची मादी घरात साठवलेल्या स्वच्छ पाण्यावर अंडी घालते. या अंड्यातून बाहेर पडणाऱ्या डासांच्या अळ्या त्याच पाण्यात वाढतात. चार-पाच दिवसांनंतर या अळ्यांचे कोष बनतात. हे कोशही पाण्यातच जिवंत राहतात. कोषातून दोन दिवसांनी डास बाहेर पडतात. याचा अर्थ डासांच्या उत्पत्तीसाठी साठलेल्या पाण्याची आवश्यकता असते.
आपण घरात पाण्याची साठवण करतो. तसेच घराभोवती परिसरासाठी केलेले सांडपाणी असे साठलेले पाणी डासांच्या वाढीस उपयुक्त असते. साठलेल्या पाण्यात डासांच्या आळ्या वाढल्या तरी आपण त्याकडे विशेष लक्ष देत नाही. व त्यामुळे डासांची उत्पत्ती विनासायास होते. डासांच्या अंड्यापासून त्याचा डास होण्यास आठ ते दहा दिवसांचा कालावधी लागतो. म्हणून आपण जर दर आठवड्यास साठलेले पाणी एकदा पूर्णपणे वापरून ड्रम कोरडा केला, सुकवून नंतर परत भरला, तर त्या पाण्यात असलेल्या पण नजरेस न दिसणाऱ्या अंडी आल्या मारल्या जातील. तसेच घराभोवती चे फाटलेल्या पाण्याची डबकी बुजविली किंवा साठलेले पाणी वाहते केले, तर दासांचे उत्पत्तीस आळा बसेल.
आपल्या घरातील पाण्याचे काही साठे असे पूर्णपणे रिकामे करता येणे शक्य नसते. उदा. घरावर असलेली पाण्याची टाकी किंवा फ्लॅटच्या तळघरात असलेली साठवलेले पाणी अशा ठिकाणी डासांनी अंडी घालू नयेत, म्हणून या टाक्या पूर्णपणे झाकण टाकून बंद ठेवाव्यात. म्हणजे डास टाकीत शिरू शकणार नाही. आपल्या घरामध्ये आपल्याकडून दुर्लक्षित असणारे साठलेले पाणी फ्लॉवर पॉट, कुलर, मनी प्लांट,घरातील छोटे शोभेचे कारंजे, फ्री चा खालचा ट्रे अशा ठिकाणी असते. तर आठवड्यास या वस्तूतील पाणी बदलले गेले नाही तर डासांना अंडी घालण्यास उत्तम जागा मिळते.
पावसाळ्यात घराच्या मागच्या अंगणात किंवा गच्चीवर आपण टाकलेला भंगार मालात पाणी साचते. हे पाणी फेकून देण्याचे आपल्या लक्षातही येत नाही. पाऊस गेल्यावर उन्हामुळे या वस्तू आपोआप वाढते. अशा दृष्टीने आपण त्याकडे पाहतही नाही, पण त्याच पाण्यात डासांची भरपूर वाढ होऊ शकते. हिवताप, डेंग्यू व चिकनगुण्या या रोगाचा प्रसार वाढू नये म्हणून उत्पत्ती वर निमंत्रण महत्वाचे यासाठी आपण फक्त एवढेच करायचे आहे.
- घरात पाणी साठविण्याची सर्व भांड्यातील पाणी वापरून रिकामी करून कोरडी करायची आहे. व त्यानंतर त्यात पुन्हा पाणी भरायचे आहे.
- घरातील मोठ्या टाक्या रिकाम्या करता येणे शक्य नाहीत त्यांना घट्ट झाकण बसवायचे आहे.
- घरातील फ्लॉवरपॉट, कुलर व फ्रीज चा खालचा ट्रेमधील पाणी दर आठवड्यास रिकामे करायचे आहे.
- घराच्या मागच्या अंगणात किंवा गच्चीवर असलेल्या भंगार मालाची विल्हेवाट लावायची आहे.
- घराभोवतीच्या पाण्याची डबकी असतील तर ही बुजविणे किंवा सदर ठिकाणी पाणी वाहते केले जाईल याबाबत दक्षता घेणे.
येणाऱ्या पावसाळ्यात पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात हिवताप, डेंग्यू व चिकनगुण्या सारखे रोग पसरू नयेत, म्हणून वेगळी खबरदारी घेणे गरजेचे आहे. अशी माहिती पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय संचालक तथा आरोग्य वैद्यकीय अधिकारी यांनी दिली आहे.