शबनम न्युज | मनोरंजन
ओ शेठ हे गाणे अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावत आहे. या गाण्याचे गायक उमेश गवळी यांनी हे गाणे चोरले असल्याची तक्रार या गाण्याच्या गीतकार संध्या व प्रणिकेत यांनी केली आहे.
संध्या व प्रणिकेत यांचे असे म्हणणे आहे की, ओ शेठ हे गाणे आम्ही लिहिले, आम्ही संगीतबद्ध केले व आम्हीच याचा व्हिडिओ पण तयार केला. परंतु, उमेश गवळी याने या गाण्याची मालकी आमच्याकडून हिसकावून घेतली असून या गाण्याचा मालक मीच असल्याचे उमेश गवळी सर्वांना सांगत आहे. उमेश गवळी यांनी पुणे येथील बिबवेवाडी पोलीस स्टेशन येथे यासंदर्भात तक्रार दाखल करून मी या गाण्याचा मालक असल्याचे म्हटले आहे. परंतु या गाण्याचे गीतकार संध्या व प्रणिकेत यांनी उमेश गवळी यांचे म्हणणे फेटाळले असून या गाण्याचे मालक आम्ही म्हणजे संध्या व प्रणिकेत असल्याचे सांगितले आहे.
उमेश गवळी यांनी सदर गाण्याचे हक्क स्वतःकडे ठेवली आहे. ते त्यांनी स्वतःकडे न ठेवता आम्हाला आमचे गाणे परत करावे, आमची गाण्याची मालकीहक्क आम्हाला मिळावी, अशी मागणी संध्या व प्रनिकेत यांनी प्रसारमाध्यमांकडे केली आहे.