वृत्तसेवा
शबनम न्यूज : मुंबई (दि.१८ डिसेंबर) :- छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण देशाचे दैवत आहेत. त्यांचा अवमान तर दूर, कणभर अनादरही खपवून घेणार नाही. बंगळूरमधील समाजकंटकावर कडक कारवाईसाठी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी कर्नाटक सरकारला कडक कारवाईचे आदेश द्यावेत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
बंगळूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत अघटीत घडले आहे, तर त्याची कसून चौकशी करायलाच हवी. या प्रकाराकडे डोळेझाक करू नका, असे सांगून मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, गेले कित्येक वर्ष कर्नाटकमधील मराठी बांधवांवर अत्याचार केला जात आहे. आता तर शिवरायांसारख्या आपल्याआराध्य दैवताची विटंबना करण्याची घटना घडते. तेथील सरकार याकडे डोळेझाक करते, हे दुर्दैवी असल्याचे त्यांनी सांगितले.
बंगळुरूमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे विटंबना प्रकरण अतिशय निंदनीय आहे. छत्रपती शिवाजी महाराज सगळ्या देशाचे दैवत आहेत. त्यांचा अवमान तर दूर, कणभर अनादरही खपवून घेणार नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी या घटनेबाबत निषेध व्यक्त केला आहे.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) December 18, 2021