शबनम न्यूज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड मौजे थेरगाव मध्ये महानगरपालिकेच्या वतीने ऑक्सिजन पार्कची उभारणी करा, अशी मागणी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे माजी नगरसेविका मनीषा प्रमोद पवार यांनी मनपा आयुक्तांना निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, एकविसाव्या शतकात आयटी पार्क, टेक्स्टटाईल पार्कपासून अगदी वाईन पार्क पर्यंत विकासाच्या नवनवीन कल्पना मांडून त्यांना मूर्त स्वरूप देण्याचे गर्क असलेला मानवी समाज त्याच्या पृथ्वीवरील अस्तित्वासाठी अत्यंत अनिर्वाय असलेल्या ऑक्सीजन पार्कच्या निर्मितीचा विचार करताना दिसत नाही. हे खरोखरच धक्कादायक आहे. आपल्याला एक मिनिटही श्वासाशिवाय जगता येणार नाही. श्वास म्हणजे प्राणवायू हेच जीवन! त्यानंतर या अस्तित्वावर उभारलेले विकासाचे इमले सर्वाधिक महत्त्व प्राणाला आणि प्राणवायू देणाऱ्या वन संपलेला द्यायला हवे.
आपल्या प्रगतीशील पिंपरी चिंचवड शहरांमध्ये देखील हीच अवस्था असून नुसतेच सर्वत्र मोठमोठे सिमेंटची जंगले विकसित होताना दिसत आहेत. यामध्ये गांभीर्याची बाब ही आहे कि, शहरातील अशंत: शेतकरी राहिला असून लक्षावधी एकर जमिनी शेतकऱ्यांना शेती परवडत नसल्याने त्याकडे पाठ फिरवल्यामुळे सध्या अनेक क्षेत्र पडीक आहे. सोबतच अनेक गायरान जमिनी, नदीपत्रालगत ग्रीन झोन, मधील क्षेत्र देखील पडीक असून या जमिनीवर आपण ऑक्सीजन पार्क अर्थात प्राणवायू उद्याने थेरगाव सह शहरात उभी करू शकतो.
सबब असा अभिनव प्रकल्प सांगली सारखे जिल्ह्यात विटा जवळ गार्डन या प्रकाराचा एक छोटासा पथदर्शी प्रकल्प साडेतीन एकर क्षेत्रात २३ झाडे लावून ८० ते ९ प्रकारची निर्माण केला असून, त्यास २००३ च्या दुष्काळात प्रारंभ करतांना त्या शेकडो एकर पसरलेल्या माळरानावर जिवंतपणाचे कसलेच लक्षण नव्हते, सुरुवातीला अर्धा एकर क्षेत्रात कडुनिंब, चिंच, शेवगा ,सीताफळ, गुळभेंडी या प्रजातींची रोपे लावली. त्या ४५० रोपांना रोज पन्नास लिटर पाणी नेऊन सलाईनच्या बाटल्या बांबूवर टांगून त्यातून थेंबाथेंबाने त्यांनी पाणी दिले असून पन्नास लिटर पाणी त्या माळरानावर २००३ च्या भयंकर दुष्काळातही ४५० रोपांना पुरले. सारी रोपे हिरवीगार असायची आता २०१० पर्यंत क्षेत्र वाढवून साडेतीन एकर क्षेत्रामध्ये अशी झाडे असून यासाठी पाच हजार लिटर पाणी टॅंकरने घेऊन ते साठवता येईल, अशा जमिनीवरील उंचवट्यावर ठेवून पाइपने सर्वत्र पाणी उताराने फिरवून नैसर्गिक दाबाने ड्रिप द्वारे रोपांना देण्याची व्यवस्था केली. पहिल्या अर्धा एकर क्षेत्रात आता जवळपास जंगल तयार झाले आहे.
शहराच्या प्रत्येक प्रभागात छोटे-छोटे प्रकल्प उभारून कडुनिंब, करंज, शेवगा, शिवण, गिरीपुष्प, सीताफळ, रामफळ, चिंच, बोर, बेल, कवट, आवळा, हिरडा, बेहडा, एरंडी, मोगली, वड, पिंपळ, उंबर,पेरू, चिकू, मोसंबी, आंबा, नारळ, लिंबू, बांबू, अशोक, कदम, कडीपत्ता, मुंजा, पिंपळ, बदाम, अंजीर, पर्जन्यवृक्ष, आपटा, चाफा, पारिजात, पळस, सुरू, रिठा, बिब्बा, बकुळ, कोरफडीचे तुळस, जांभळ, बेलाचे वृक्ष लागवड करावी व या प्रकल्पाची सुरुवात खेडेगावातून करावी, असेही सदर निवेदनात मनिषा पवार यांनी नमूद केले आहे.