शबनम न्युज | मुंबई
राज्यात शिवसेना भाजपाचे सरकार यावे यासाठी शिंदे गटाने बंडखोरी केली असल्याचे सांगितले जात आहे. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीतील इतर पक्ष काहीच निर्णय घेत नसल्याचे पाहून अखेर मंगळवारी राज्यातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तर काही अपक्ष आमदारांनी सरकार अल्पमतात असल्याचा दावा केला. त्या पार्श्वभूमीवर राज्यपालांनी आज मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून २४ तासांत बहुमत चाचणीला सामोरे जाण्यास सांगितले.
उद्या (३० जून) कोणत्याही परिस्थितीत बहुमत चाचणी करण्याच्या अनुशंगाने हे पत्र पाठवण्यात आलेलं आहे. त्यासाठी विशेष अधिवेशन बोलावलं जावं, असे आदेश दिले गेलेत. याला आव्हान शिवसेनेकडून देण्यात आलं आहे. सुप्रीम कोर्टात याला आव्हान देण्यात आलं असून याप्रकरणी संध्याकाळी पाच वाजता तातडीची सुनावणी होणार आहे. संध्याकाळी पाच वाजता सुनावणी होण्याआधी तीन वाजेपर्यंत याबाबतची कागदपत्र सादर करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयात राज्यपालांच्या आदेशाविरोधात याचिका दाखल केली आहे. राज्यपालांच्या आदेशाविरोधात शिवसेना सर्वोच्च न्यायालयात गेली आहे. तसेच शिवसेनेतील बंडखोर आमदारांचा गट एकनाथ शिंदे यांच्यासोबत उद्या मुंबईत पोहोचणार असल्याची माहिती स्वत: एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
विधानसभेचे एकूण सदस्य - २८८ दिवंगत सदस्य - ०१ कारगृहात सदस्य - ०२ सध्याची सदस्य संख्या - २८५ एकनाथ शिंदे गटाकडे किती आमदार - ३९ आता सभागृहाची सदस्य संख्या- २८५ बहुमताचा आकडा-१४३ भाजपचं संख्याबळ- भाजप (१०६ )+शिंदे गट (३९ )+अपक्ष (२७ )=१७२ मविआचं संख्याबळ- शिवसेना (१६ )+ राष्ट्रवादी (५१ )+ काँग्रेस (४४)= १११ शिंदे गट भाजपसोबत न गेल्यास भाजपकडे किती संख्याबळ?- भाजप (१०६ )+ अपक्ष (२७ ) = १३३