शबनम न्युज | मुंबई
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या संतापजनक वक्तव्यावर अनेकांकडून निषेध व्यक्त केला जात आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ‘महाराष्ट्राच्या राज्यपालांनी सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत’, असे वक्तव्य करत या प्रकरणी पंतप्रधान मोदींकडे हस्तक्षेप करण्याची मागणी यावेळी शरद पवार यांनी केली आहे. ते एका पत्रकार परिषदेत बोलत होते.
ते म्हणाले, राज्यपालांनी सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत, राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी या प्रकरणात हस्तक्षेप केला पाहिजे, बेजबाबदार विधाने करणाऱ्यांना मोठी पदे देणे चुकीचे आहे. असे ही शरद पवार म्हणाले. शिवाय, छत्रपती शिवाजी महाराजांची वंशज आणि राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांनी मराठा योद्धा बद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून राज्यपालांना त्यांच्या पदावरून बडतर्फ करण्याची मागणी केली आहे.