शबनम न्युज | मुंबई
जितेंद्र आव्हाड यांनी शिर्डीतल्या मेळाव्यात राम मांसाहारी होता. १४ वर्षे वनवासात गेला होता. असं वक्तव्य केलं होतं. त्यावर ते आजही ठाम आहेत. राम हा आमच्या बहुजनांचा राम आहे. मी जे काही बोललो ते अभ्यासाशिवाय बोललो नाही असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. तसंच वाल्मिकी रामायणाचा दाखला देत जितेंद्र आव्हाड यांनी आपण काहीही चुकीचं बोललो नाही असंही म्हटलं आहे.
ते म्हणाले, आमचा राम जात-पात न मानणारा आहे, शबरीची बोरं खाणारा आहे, जे राम-राम करत आहेत त्यांना मी सांगेन की तुमचा राम तुम्हाला निवडणुकीसाठी बाजारात आणायचा आहे, आमचा राम आमच्या जन्मापासून आमच्या हृदयात आहे असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.
“मी महाराष्ट्राला अनेकदा संबोधित करत असतो. मी इतिहासाचा विपर्यास करत नाही. विकृतीकरण माझं काम नाही. मी जे काही बोललो ते ओघात बोलून गेलो. राम, प्रभू श्रीराम, विठ्ठल सगळी एकच रुपं आहेत. मी श्रीरामांबद्दल बोललो की ते मांसाहरी होते. जे याविरोधात बोलत आहेत त्यांच्या माहितीसाठी वाल्मिकी रामायणात अयोध्याकाण्ड आहे. त्यात एका श्लोकाचा संदर्भ आहे. तो मला वाचायचा नाही. मात्र तो उपलब्ध आहे तुम्हाला वाचायचा असेल तर तुम्ही तो वाचू शकता असं जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकारांना उद्देशून म्हटलं आहे. मी ते वाचत नाही कारण मला वाद वाढवायचा नाही.”