शबनम न्युज | आकुर्डी
आकुर्डी पंचतरा नगर येथील उद्यानामधील तुटलेली खेळणी दुरुस्त करून मोठ्या प्रमाणात साचलेला कचरा उचलून उद्यानाची साफसफाई करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना( उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे युवासेना उपशहर प्रमुख पिंपरी चिंचवड शहर तसेच विठ्ठल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष निखिल दळवी यांनी मुख्य अधीक्षक उद्यान विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांना निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रभाग क्रमांक 15 आकुर्डी पंचतारा नगर मधील पांढरकर उद्यान मध्ये मोठ्या प्रमाणात कचरा व नारळाच्या झाडाच्या फांद्या तुटून पडल्या आहेत. बऱ्याच दिवसापासून या नारळाच्या झाडाच्या फांद्या व कचरा या उद्यान मध्ये पडलेले असून उद्यानाकडे उद्यान विभागाचे लक्ष नाही. सदर उद्यानामध्ये बरीच खेळणी तुटलेली देखील आहे. सदर खेळणी आणि उद्यानांची दुरवस्था झाली आहे. लहान मुलांना खेळण्यासाठी खेळणी नाही तसेच उद्यानामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक येत असतात लहान मुले येत असतात. यामुळे या परिसरातील नाराजीचे वातावरण आहे. लवकरात लवकर उद्यानामध्ये सर्व खेळणी दुरुस्त करावी किंवा नवीन बसवावे उद्यानामधील मोठ्या प्रमाणात कचरा उचलून उद्यानाची साफसफाई करावी, असे सदर निवेदनात नमूद करण्यात आले आहे.