शबनम न्युज | मुंबई
राज्यातील जनतेच्या मनामध्ये भारतीय जनता पक्षाबद्दल संताप आहे. राज्यात महाविकास आघाडीला चांगला प्रतिसाद मिळत असून, लोकसभेला 32 ते 35 जागा मिळतील, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी केला आहे.
ते म्हणाले, “राज्यातील जनतेच्या मनामध्ये भारतीय जनता पक्षाबद्दल संताप आहे. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने लोक वाट बघत असून त्यांचा कल मतदानातून दिसून येईल. राज्यात महाविकास आघाडीला चांगला प्रतिसाद मिळत असून लोकसभेला 32 ते 35 जागा मिळतील,” असे त्यांनी म्हटले
तसेच सांगली बाबत काँग्रेसचे नेत्यांनी काय केले? हे बघितले पाहिजे. योग्य लढत व्हावी, हा माझा प्रयत्न आहे. भाजपा विरोधात ताकद एकत्र करण्याचे काम केले पाहिजे. राज्यस्तरीय बैठकांतून काय झाले? हे आता बाहेर सांगणे योग्य नाही. जे लोक वावड्या उडवत आहेत. त्यांनी आत्मचिंतन करावे, एकास एक लढत व्हावी, अशी माझी भूमिका आहे, अर्ज माघारी होई पर्यंत काहीही होऊ शकते, असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.