शबनम न्यूज | मुंबई
मुंबई | प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्यात तोरणाचे रुग्ण संख्या कमी होत असताना आता महा विकास आघाडी सरकार वतीने लादण्यात आलेले निर्बंध शिथिल होणार आहेत 15 ऑगस्ट पासून त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे याबाबत ची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्विटर द्वारे दिली आहे.
Advertisement
सुधारित नियमावलीतील महत्त्वाचे मुद्दे –
- राज्यातील हॉटेल्स रोज पन्नास टक्के आसन क्षमतेने रात्री दहा वाजेपर्यंत सुरू राहणार.
- सर्व प्रकारची दुकाने रोज रात्री दहा वाजेपर्यंत सुरू राहतील
- मॉल्स रोज रात्री दहा वाजेपर्यंत सुरू राहतील
- जिम, व्यायामशाळा, पार्लर, सलून 50 टक्के क्षमतेने रोज रात्री दहा वाजेपर्यंत सुरू राहतील
- खाजगी कार्यालय पूर्ण वेळ सुरू राहतील
- समुद्र किनारी, चौपाटी, मैदाने यांचा निर्णय स्थानिक प्रशासनाकडे देण्यात आला आहे
- लग्नसमारंभातील उपस्थिती किमान संख्या 50% असेल बंदिस्त ठिकाणी शंभर लोक पैकी 50 टक्के तर खुल्या ठिकाणी दोनशे लोकांपैकी 50 टक्के अशी क्षमता निर्धारित करण्यात आली आहे .
- चित्रपटगृहे, नाट्यगृहे, धार्मिक स्थळे, मल्टिप्लेक्स बंद राहतील .
- राजकीय ,धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम मेळावे यांना बंदी असेल
- कर्मचाऱ्यांसाठी लसीचे दोन डोस आवश्यक आहे
- ग्राहकांसाठी लसीकरणाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे .
#BreakTheChain सुधारित नियमावलीतील महत्त्वाचे मुद्दे pic.twitter.com/HMrS9kdoBy
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) August 11, 2021
Advertisement