शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड | प्रतिनधी
भारतीय स्वातंत्र्याचा 75 वा स्वातंत्र्य दिनाचा अमृतमहोत्सव पिंपरी चिंचवड शहर काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष श्री दिलीप शेठ पांढरकर यांच्या वतीने आकुर्डी येथे साजरा करण्यात आला.
यावेळी आकुर्डी भागातील 300 विद्यार्थ्यांना वह्या, पेन, बिस्कीट, चॉकलेट इ. खाऊचे वाटप यावेळी करण्यात आले.
१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत ब्रिटीशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. या दिवसाच्या स्मरणार्थ, दरवर्षी १५ ऑगस्ट हा दिवस भारतात स्वातंत्र्य दिन म्हणून आपण सर्व भारतीय बंधू-भगिनी साजरा करत असतो. यावर्षी आपण ७५ वा स्वातंत्र्य दिनाचा अमृतमहोत्सव साजरा करीत आहोत.
करोना विषाणू जरी कमी झाला असला तरी तिसऱ्या लाटेची शक्यता पाहता आणि आरोग्याचा विचार करता सरकारने घालून दिलेल्या सर्व नियमातच या वर्षाचा स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात आला पाहिजे, अशा यावेळी शासनाच्या सर्व नियमांचे पालन करत स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.
आज सलाम, आहे त्या वीरांना ज्यांच्यामुळे आज हा दिवस आपण पाहात आहोत, ती आई आहे भाग्यशाली जिच्यापोटी जन्मलेल्या वीरांमुळे हा देश अखंड राहिला, अशा सर्व वीरांच्या मातेला मानाचा मुजरा आणि उपस्थित असलेल्या सर्व बंधू भगिनींना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा देवून भारतीय स्वातंत्र लढ्याचे महत्व आणि भविष्यात आपले स्वातंत्र चिराऊ ठेवण्याचे, आद्य कर्तव्य आपल्या सर्वांचे आहे, असे मनोगत श्री दिलीप पांढरकर यांनी व्यक्त केले.
उपस्थित असलेल्या सर्व विद्यार्थीनी व नागरिकांनी भारत माता की जय आशा जोरजोरात घोषणा देऊन स्वतंत्र दिनाचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
कार्यक्रमात काँग्रेसचे जेष्ठ कार्यकर्त्ये श्री सुरेश लिंगायत यांनी सूत्रसंचालन केले.
कार्यक्रमास उपस्थित अँड. मोहन अडसूळ, अँड. राजेंद्र काळभोर, श्री बाबूलाल वाघमारे , मुख्याध्यापक श्री अशोकराव पांढरकर , श्री प्रकाश देवाडीकर सौ अर्चना कडु , सौ सोनाली वाल्हेकर , सौ शितलताई तेली , सौ केतकी डेडसेना , सौ दुर्गाताई पांढरकर , सौ नेहा पांढरकर आकुर्डी पांढरकर वस्ती मधील मोठ्या प्रमाणात नागरिक जनसमुदाय उपस्थित होता.
भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन सौ प्राजक्ता पांढरकर यांच्या हस्ते करण्यात आले, कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थिती मध्ये
चिंचवड येथील पालिकेच्या शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती रसिका परब यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
कार्यक्रमास आकुर्डी पांढरकर वस्ती भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमा उपस्थित सर्व अतिथींचे आभार प्रदर्शन श्री हर्षवर्धन पांढरकर यांनी मानले.