शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
राज्यातील रास्तभाव रेशन दुकानदारांच्या समस्या सोडविण्याबाबत तसेच कोरोना संसर्ग ग्राहकांना तसेच दुकानदारांना न होण्यासाठी, उपाययोजना करणे बाबत तसेच आरोग्याची काळजी घेणे बाबत माजी खासदार गजानन बाबर यांनी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांचे प्रधान सचिव यांना वारंवार पत्रव्यवहार करून मागणी केली होती.त्यांच्या या मागणीला यश आले असून अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांचे प्रधान सचिव यांनी माजी खासदार गजानन बाबर यांना त्यांची मागणी मान्य करण्यात आली असल्याचे निवेदनाद्वारे म्हंटले आहे. अशी माहिती माजी खासदार गजानन बाबर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात त्यांनी म्हंटले आहे कि, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांचे प्रधान सचिव यांना पत्रव्यवहार करून कोरोना परिस्थितीमध्ये लाभार्थ्यांच्या तसेच दुकानदारांच्या सुरक्षतेसाठी छत्तीसगड राज्यामध्ये ज्याप्रमाणे वजन काट्याला मशीन जोडून धान्य वितरण केले जाते त्याच धर्तीवर महाराष्ट्रात सुद्धा उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली होती.
तसेच आम्ही वारंवार पाठपुरावा केल्यामुळे यापूर्वी आम्हाला पत्राद्वारे ईरिस स्कॅनर मशीन आरोग्याच्या दृष्टिकोनातून बसवणार आहोत असे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांनी कळवले होते त्याचप्रमाणे आम्ही त्याला लवकरात लवकर बसवण्यात यावेत अशी मागणी केली होती.
उपरोक्त विषय पाहता आमच्या मागणीची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने ईरीस स्कॅनर व वेगिंग स्केल ई -पाॅस मशीन सोबत जोडण्याचा मुद्दा विचारधिन आहे व पुढील निविदा प्रक्रिया राबवताना याचा विचार घेणार आहोत असे पत्राद्वारे कळवले.
धान्य वितरण करीत असताना लाभार्थ्यांचीही व रास्तभाव दुकानदार यांची आरोग्याचीही काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे असेही आम्ही वारंवार माननीय प्रधान सचिव अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांच्या निदर्शनात आणून दिले आहे.
अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांचे प्रधान सचिव यांना पत्रव्यवहार करून कोरोना परिस्थितीमध्ये लाभार्थ्यांच्या तसेच दुकानदारांच्या सुरक्षतेसाठी छत्तीसगड राज्यामध्ये ज्याप्रमाणे वजन काट्याला मशीन जोडून धान्य वितरण केले जाते त्याच धर्तीवर महाराष्ट्रात सुद्धा उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली होती.
तसेच आम्ही वारंवार पाठपुरावा केल्यामुळे यापूर्वी आम्हाला पत्राद्वारे ईरिस स्कॅनर मशीन आरोग्याच्या दृष्टिकोनातून बसवणार आहोत असे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांनी कळवले होते त्याचप्रमाणे आम्ही त्याला लवकरात लवकर बसवण्यात यावेत अशी मागणी केली होती.
उपरोक्त विषय पाहता आमच्या मागणीची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने ईरीस स्कॅनर व वेगिंग स्केल ई -पाॅस मशीन सोबत जोडण्याचा मुद्दा विचारधिन आहे व पुढील निविदा प्रक्रिया राबवताना याचा विचार घेणार आहोत असे पत्राद्वारे कळवले.
धान्य वितरण करीत असताना लाभार्थ्यांचीही व रास्तभाव दुकानदार यांची आरोग्याचीही काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे असेही आम्ही वारंवार माननीय प्रधान सचिव अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांच्या निदर्शनात आणून दिले आहे. असे हि माजी खासदार गजानन बाबर यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हंटले आहे.