“सदा आनंदनगर” कै.मातोश्री श्रीमती पद्मावती अम्मा कृष्णा शेट्टी व्यापार व निवासी संकुलाचे १३० घरांचा लोकार्पण सोहळा
शबनम न्युज | पुणे
पुणे | प्रतिनिधी
झोपडपट्टीवासीयांना हक्काचेे व स्वतःच्या मालकीचे मिळायला हवे. त्यांना सन्मानाने जगता आले पाहिजे. अशा परिस्थितीत गोरगरिबांना स्वतःच्या मालकीची टुमदार घरे मिळवून देण्यात सदानंद शेट्टी यांनी पुढाकार घेतला. याबाबत अजित पवार यांनी शेट्टी यांचे कौतुक केलं. भविष्यात पुण्याचा सर्वांगीण विकासाकरिता पुणेकरांच्या हातभाराची गरज असल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
पुणे शहर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातून स्थायी समितीचे अध्यक्ष सदानंद शेट्टी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या आणि पूर्णत्वास गेलेल्या ‘सदा आनंद’ नगरच्या 130 घरांचा चावी वाटप, करारनामा आणि कै. मातोश्री श्रीमती पद्मावती (अम्मा) कृष्णा शेट्टी व्यापार व निवासी संकुला चा लोकार्पण सोहळा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी खा. वंदनाताई चव्हान, मनपा विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, माजी महापौर अंकुश काकडे, शहर अध्यक्ष प्रशांत जगताप, काँगेस पक्षाचे गटनेते आबा बागुल, जेष्ठ नेते भीमराव पाटोळे, जेष्ठ नेते शंकर तोडकर, ही समिती माजी अध्यक्ष श्रीकांत शिरोळे, माजी नगरसेवक बुवा नलावडे, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण प्रमुख राजेंद्र निंबाळकर, युनिक कंट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड संचालक शेख अल्ताफ इलाहीबक्ष, स्थायी समिती माजी अध्यक्ष सदानंद शेट्टी, नगरसेविका सुजाता शेट्टी, साक्षात शेट्टी आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, मंगळवार पेठ परिसरातील खासगी आणि सरकारी जागेत वरील 17 झोपडपट्ट्या बाबत लवकरच निर्णय घेऊन त्या संदर्भात पुण्यामध्ये एक बैठक नाईकनवरे, सी ई ओ राजेंद्र निंबाळकर आणि सदानंद शेट्टी यांच्या समवेत आयोजित करून योग्य निर्णय घेण्यात येईल. त्याच बरोबर टी डी आर च्या संदर्भात देखील भविष्यात चांगला धोरण तयार करण्यात येईल असे सांगितले.
सदानंद शेट्टी म्हणाले, मंगळवार पेठ सारख्या अठरा पगड जातीचा समावेश असलेल्या भागात ‘सदा आनंदनगर’ हा प्रकल्प उभा राहिला. हा प्रकल्प उभारण्यात आई पद्मावती अम्मा शेट्टी यांचे योगदान महत्वपूर्ण आहे. गोरगरिबांना हक्काचं घर मिळावं यासाठी नगरसेविका सुजाता शेट्टी यांच्या सहकार्यातून हा प्रकल्प उभा राहिला. सदा आनंदनगर हा वेगळा पॅटर्न निर्माण झाला असे शेट्टी यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते नामदेव खराडे, रहमान शेख, बशीरअली शेख, सुमन दिघे व सुभाष कदम यांना घराच्या चावी व नस्ती प्रदान करण्यात आल्या.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुधीर गाडगीळ यांनी केले तर प्रास्ताविक माजी स्थायी समिती अध्यक्ष सदानंद शेट्टी यांनी केले.