“ देश आधुनिक क्षेत्रात आघाडीवर
आहे.प्रशिक्षणाची माध्यमे विपुल आहेत.मात्र संस्कार घडवणारी यंत्रणा अपुरी आहे.मात्र ही उणीव भरुन काढण्याची क्षमता शिक्षकांमधे निश्चितच आहे.शिक्षक यश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांच्या आयुष्याला योग्य वळण देतात.त्यातून समाज घडून देशाच्या उत्कर्षाला हातभार लागतो.या कामी शिक्षकांनी डाॅ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा आदर्श ठेवावा.जर१०० राधाकृष्णन यातून घडले तर संपूर्ण देश संस्कारीत होऊ शकेल ” असे प्रतिपादन डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी केले.
डाॅ.मधुसूदन घाणेकर ब्रह्मध्यान विश्वपीठ तर्फे शिक्षक दिनानिमित्त १५ शिक्षकांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक ब्रह्मध्यान पुरस्कार २०२१ डाॅ.घाणेकर यांच्या शुभहस्ते ऑनलाईन प्रदान करण्यात आले.सदर सोहळ्याच्या अध्यक्षीय भाषणात डाॅ.मधुसूदन घाणेकर बोलत होते. हेमंत नेहते सर या कार्यक्रमाचे निमंत्रक होते.नागेश हुलावळे यांनी प्रास्ताविक केले.सौ.राजश्री मराठे यांनी स्वागतगीत व ईशस्तवन सादर केले.प्रतिमा काळे आणि राजश्री मराठे यांनी सूत्रसंचालन केले.डाॅ.नीलम खानापूरकर आणि रविन्द्र तरे या पुरस्कारार्थींनी प्रातिनिधिक मनोगते व्यक्त केली.
अक्षरमंच प्रतिष्ठान संस्थेचे संस्थापक आणि अध्यक्ष डाॅ.योगेश जोशी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.शिक्षक मंडळी शाळेतील जबाबदारी पार पाडून सामाजिक-राष्ट्रीय बांधिलकीच्या भावनेतून मौलिक योगदान देत असतात, अशा शिक्षकांना सन्मानित करण्याचा उपक्रम निश्चितच स्तुत्य असल्याचे डाॅ.योगेश जोशी यांनी सांगितले. ध्यानाच्या पुढची पायरी म्हणजे यशस्वी जीवनासाठी ब्रह्मध्यान करणे आणि या प्रसार कार्यातून षड्रिपुंवर विजय प्राप्त करणे सुसह्य होते.यासाठी शिक्षकांनी ब्रह्मध्यान आत्मसात करावे असे आवाहन डाॅ.घाणेकर यांनी ब्रह्मध्यान विश्वपीठाच्या वतीने समारोपात केले.
राष्ट्रीय आदर्श शिक्षक ब्रह्मध्यान पुरस्काराचे मानकरी-
– – डाॅ.संजिवनी मुळे,श्रध्दा शिंदगीकर, डाॅ.राजू रोझोदकर,डाॅ.नीलम खानापूरकर, अरुण पुराणिक,वनमाला पाटील,रविन्द्र तरे,रमेश तारमळे,स्नेहल सोपारकर,वनिता वंजारी,हेमंत नेहते,शिवाजी खैरे,प्रतिमा काळे,राजश्री मराठे आणि नागेश हुलावळे अशा १५ शिक्षकांना राष्ट्रीय पातळीवर
आदर्श शिक्षक ब्रह्मध्यान पुरस्काराने डाॅ.घाणेकर यांच्या शुभहस्ते ऑनलाईन सन्मानित करण्यात आले.