शबनम न्युज | मुंबई
मुंबई | प्रतिनिधी
सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकारने आपले म्हणणे मांडले, त्यात इम्पिरिकल डेटा देण्यास असमर्थता दर्शविली आहे. त्यामुळे आता वस्तुस्थिती समोर आली असून इतके दिवस राज्य सरकार आणि महाविकास आघाडीला कारण नसताना बदनाम करण्याचा प्रयत्न काही मंडळींनी केला, असा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.
Advertisement
केंद्र सरकारने न्यायालयात सादर केलेले प्रतिज्ञापत्र अद्याप आमच्यापर्यंत आलेले नाही. त्यामुळे प्रतिज्ञापत्र हाती आल्यानंतर त्यावर सविस्तर भूमिका मांडू, असेही अजित पवार यांनी सांगितले. तसेच केंद्र सरकारने आपली जबाबदारी झटकली आहे का? हे देखील प्रतिज्ञापत्र पाहिल्यानंतरच कळेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
Advertisement