महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिकांना आपले व्यवहार बंद ठेवण्याचे आमदार संग्राम जगताप यांचे आवाहन
शबनम न्युज | अहमदनगर
अहमदनगर | प्रतिनिधी
लखीमपुर येथील शेतकरी आंदोलनात आंदोलनकर्त्यांच्या अंगावर गाडी घालून शेतकरी आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी महाराष्ट्रात महाविकासआघाडी वतीने आज महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला आहे. या महाराष्ट्र बंद आंदोलनात अहमदनगर शहरातील अनेक व्यावसायिक विक्रेते त्यांनी सहभागी होण्याचे आवाहन महाविकासआघाडी वतीने आमदार संग्राम जगताप यांनी केले आहे.
महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर आज वाडीया पार्क येथील महात्मा गांधी पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात आले. सदर आंदोलन आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले असून भाजप सरकारचा या आंदोलनाने तीव्र शब्दात निषेध करण्यात आला आहे. या आंदोलन वेळी आमदार संग्राम जगताप, स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले, ज्येष्ठ नेते उबेद शेख, संजय झिंजे , अभिजीत खोसे, विधाते सर आदी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पदाधिकारी आजी-माजी नगरसेवक उपस्थित होते.