शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
गेल्या पाच वर्षांत पिंपरी-चिंचवडमध्ये शहरात भाजपाने जनतेच्या हिताची, भ्रष्टाचारमुक्त असणारी दहा कामे दाखवा, पुन्हा शहरात पाऊल ठेवणार नाही, असे आव्हानच शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी भाजपला दिले आहे. पिंपरी-चिंचवड शहरात राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा झाला. त्यात बोलताना डॉ. अमोल कोल्हे यांनी भाजपाला आव्हानच दिले.
तसेच यावेळी माजी आमदार विलास लांडे, माजी महापौर, शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी महापालिकेच्या कारभारावर टीका केली.
२०१७ च्या महापालिका निवडणूकीपूर्वी आश्वासनांचा पाऊस पडला होता. ती गाजराची शेती होती, अशी चर्चा आता शहरात रंगू लागली आहे. औद्योगिक नगरी असणाऱ्या पिंपरी-चिंचवडला पिण्याच्या पाण्याची प्रश्न भेडसावत आहे. असे कोल्हे म्हणाले, तसेच ”देशातील परिस्थिती पहिली, तर शेतकरी, कामगार वर्गांचा आवाज दडपला जात आहे. २०१७ पूर्वी विकास म्हटले की पिंपरी-चिंचवड, रस्ते म्हटले की पिंपरी-चिंचवड. पिंपरी-चिंचवड म्हटले की अजित पवारांचे नाव घेतले जायचे. मात्र, ही ओळख बदलली आहे. असे हि यावेळी अमोल कोल्हे यांनी म्हंटले आहे.