शबनम न्युज | पुणे
पुणे | प्रतिनिधी
भाजपाचा जो मुख्य अजेंडा आहे, आपण पाहिलं की केंद्रामधील भाजपाच्या सरकारने २०१९ पासून २०२१ काळात ज्या पद्धतीने कोरोना संसर्गाची वाढ झाल्यानंतरही, ज्या काही सुरक्षित व्यवस्था निर्माण करायला पाहिजे होत्या त्या केल्या नाहीत. असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज पुण्यात माध्यमांशी बोलताना केला.
पुढे बोलताना नाना पटोले म्हणाले कि, “साध्या लसीकरणात देखील दलाली खाण्याची व्यवस्था केली आणि आपण पाहिलं असेल की मार्च महिन्यापासून ते कालपर्यंत ज्याप्रमाणात करोना रूग्णांचे मृत्यू झाले. अनेकांच्या घरचे कर्ते लोकं गेले, अनेकजण आर्थिकदृष्ट्या कमकुवत झाले. तरी देखील सेलिब्रशन करण्याचा भाजपाने जो नवीन गोरखधंदा सुरू केला. ऑल इस वेल… अशा पद्धतीने जर पंतप्रधान देशाला संबोधित करत असतील. लोकांच्या मृत्यूवर तांडव करणं, उत्सव साजरा करणं याच्या पेक्षा दुसरं दुर्भाग्य ठरू शकत नाही. महागाई बेरोजगारी व शेतकऱ्यांचे प्रश्न हे आज आमच्या मूळावर रूजले गेलेले आहेत. देश ५० वर्षे मागे गेलेला आहे. एकीकडे चीन आपल्यावर हल्ला करतोय, अरुणाचल प्रदेशचा काही भाग त्यांनी घेतला. अनेक भागात चीन प्रवेश करतोय, त्यावर एक शब्दही बोलला जात नाही. देशातल्या अंतर्गत प्रश्नांबाबत भाजपा सरकारला काही देणंघेणं नाही.” असंही नाना पटोले यावेळी म्हणाले.
याचबरोबर, “सीबीआयच्या चौकशा लावून लोकांची दिशाभूल करण्याचा जो प्रयत्न, केंद्रात बसलेल्या भाजपा सरकारने जो सुरू केलेला आहे. त्याला जशास तसं उत्तर देण्याचं महाविकासआघाडीचं आता ठरलेलं आहे. त्यामुळे काल अजित पवार यांनी जी भूमिका मांडली आमची सगळ्यांची त्यांना सहमती आहे.” असं नाना पटोलेंनी यावेळी स्पष्टे केलं.