शबनम न्युज | राजगुरूनगर
खेड घाटात चाळीस वर्षे तरुणाने झाडास गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. जयदीप काळूराम जैद (वय 40 रा. जैडवाडी)असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत जयदीप व पत्नीचा किरकोळ वाद झाला होता. रागाच्याभरात जयदीप यांनी खेड घाटात एका झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. जयदीपचे वडील काळूराम सावळेराम जैद यांनी खेड पोलिस ठाण्यात या प्रकरणी फिर्याद दिली आहे पुढील तपास पोलीस हवालदार शेखर भोइर करीत आहेत.
Advertisement
Advertisement