शबनम न्यूज | पुणे
पुणे : हकीम समितीने रिक्षाभाडे वाढीसाठी सूत्र ठरवले परंतु रिक्षाचालकांना जास्त भाडेवाढ मिळत आहे म्हणून नागरिकांच्या तक्रारीवरून सरकारने हकीम समितीने ऐवजी खटुआ समिती नेमली. समिती नेमून दिलेल्या सूत्रानुसार महागाई, पेट्रोल दर, रिक्षाच्या सुटे भाग, जीवनावश्यक वस्तूचे वाढलेले दर यावर ती दरवर्षी रिक्षा मीटर वाढ देण्याचे सूत्र ठरवले. या सूत्रानुसार मुंबईमध्ये तीन रुपये भाडेवाढ मिळाली, परंतु पुण्यात मात्र अत्यंत तुटपुंजे अशी 69 पैसे वाढवून रिक्षाचालकांचे घोर निराशा केली. याबद्दल महाराष्ट्र रिक्षा पंचायतीने आवाज उठवला यामुळे ही मिटर दरवाढ स्थगित करून नव्याने प्रस्ताव देऊन मिटर दरवाढ केली जाणार असून यामुळे पुणे, पिंपरी बारामती येथील रिक्षा मीटरची एक लढाई यशस्वी झाली असून आता रिक्षा चालक मालकांसाठी परिवहन खात्याच्या अंतर्गत फक्त रिक्षाचालक मालकांचे स्वतंत्र कल्याणकारी महामंडळ स्थापन करावे यासाठी कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी तामिळनाडूच्या धर्तीवर केलेली घोषणा रद्द करून रिक्षाचालकांना अपेक्षित असणारी कल्याणकारी मंडळ स्थापन व्हावे यासाठी मुंबई मंत्रालय येथे आंदोलन करावे लागेल. या आंदोलनाची तयारी करावी असे आव्हान महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांनी रिक्षा चालक मालक यांना केली आहे,
महाराष्ट्र रिक्षा पंचायत वतीने पुणे येथे महामाता रमाई भिमराव आंबेडकर पूर्णाकृती पुतळा स्मारक येथे रिक्षा चालक मालक पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली यावेळी बाबा कांबळे बोलत होते, तसेच यावेळी दिवाळी संध्या गायनाचा कार्यक्रम करण्यात आला व उपस्थित रिक्षाचालकांना फराळाचे वाटप देखील संघटने मार्फत करण्यात आले.
यावेळी माता रमाई स्मारक समितीचे अध्यक्ष विठ्ठल दादा गायकवाड, महाराष्ट्र रिक्षा पंचायत पुणे शहर अध्यक्ष शफिक भाई पटेल, उपाध्यक्ष अरशद अन्सारी, कार्याध्यक्ष कुमार शेट्टी, कला व सांस्कृतिक विभागाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मुराद काजी, किरण एरंडे, अन्सारी शेख, अयाज शेख, सलमान तांबोळी, मुख्तार कोतवाल, तौफिक कुरेशी, बद्रुद्दीन शेख, व इतर रिक्षाचालक उपस्थित होते.
यावेळी पुणे शहर अध्यक्ष शफीकभाई पटेल म्हणाले कि पुणे शहरामध्ये रिक्षा मीटर मध्ये अत्यंत तुटपुंजी वाढ मिळाली होती. ही वाढ चालकांना मान्य नव्हती. आम्हाला हक्क पाहिजे… भिक नको…यामुळे आम्ही विरोध केला यामुळे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने भाडेवाढ स्थगित करून नव्याने प्रस्ताव घेऊन भाडेवाढ करण्याचे आश्वासन दिल्यामुळे सोमवार रोजी होणारा रिक्षाचालकांचा मोर्चा तात्पुरता स्थगित करण्यात आलेला आहे.
बाबा कांबळे म्हणले पुणे येथील ही लढाई रिक्षा चालक मालकांनी काही अंशी जिंकले असून
लवकरच प्रशासन योग्य ते मिटर वाढ करेल अशी अपेक्षा आहे.
रिक्षा चालक मालक यांच्या जीवनावर दूरगामी परिणाम करणारे आणि रिक्षाचालकांच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे रिक्षाचालक मालक यांच्यासाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करणे.. या मंडळाबद्दल महाराष्ट्राचे कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी तामिळनाडूच्या धर्तीवर सर्वच ड्रायव्हर त्यामध्ये टेम्पो, ट्रक, बस अशा सर्वांचा एकत्रित कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याची घोषणा केली. हे मंडळ फसवे असून फक्त रिक्षा चालक मालकांसाठी स्वतंत्र कल्याणकारी महामंडळ असावे अशी रिक्षा चालकांची मागणी आहे. यामुळे एक लढाई संपली आता पुढची लढाई जिंकण्यासाठी मुंबई मंत्रालय येथे आपल्याला तीव्र आंदोलन करावे लागेल. यासाठी या लढ्यासाठी सर्व रिक्षा चालक मालक यांनी तयार राहावे. लवकरच मुंबई मंत्रालयावर रिक्षाचालक-मालक यांचा मोर्चा काढण्यात येणार आहे असे बाबा कांबळे यावेळी म्हणाले
“रिक्षा चालक मालक हा स्वयंरोजगार करणारा, सार्वजनिक सेवा देणारा घटक असून हा कामगार नाहीये परंतु रिक्षाचालकांना मात्र कामगार वर्गामध्ये व असंघटित कामगार म्हणून ढकलला जात असून यामुळे रिक्षाचालकांचा सार्वजनिक सेवेचा दर्जा घालवला जात आहे आणि त्यांना तुटपुंजे योजना देऊन निवडणुकीमध्ये याचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न सुरू आहेत. परंतु हे सर्व हाणून पाडण्यासाठी आपल्या सर्वांना एकत्र यावे लागणार आहे. त्यासाठी आता मुंबईमध्ये पुढील लढाई मंत्रालयामध्ये करावी लागेल या साठी तयार रिक्षा चालक मालकांनी सज्ज व्हावे असे आव्हान बाबा कांबळे यांनी केले आहे ,