शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड (दि.०२ डिसेंबर) :- परदेशातून वा परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या लोकांसाठी जी नियमावली करायची आहे, त्यात केंद्र सरकारच्या आणि राज्याच्या नियमावलीत तफावत होती. ती तफावत आता दूर करण्यात आली आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली.
Advertisement
केंद्र आणि राज्याचे नियम एकसारखे असावेत, भारतातील कुठल्याही शहरातील विमानतळावर परदेशातून प्रवासी आल्यास त्यांच्यासाठी एकच नियम असावा, असा प्रयत्न आपण केलेला आहे. आता महाराष्ट्रात येणाऱ्या प्रत्येकासाठी ४८ तासांमधील आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल दाखवणे बंधनकारक असेल, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.
Advertisement