शबनम न्यूज : मुंबई (दि.१६ डिसेंबर) :- विद्यापीठ कायद्यात राज्यपालांचे अधिकार कोणीही कमी करत नसल्याचे स्पष्ट करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांच्या टीकेचे खंडन केले आहे. यासंदर्भात गठीत केलेली समिती ही नावांची सूची सरकारकडे देते. पुढे राज्य सरकार या यादीमधील दोन नावे राज्यपालांकडे पाठवते. त्यावर राज्यपालांनी एका नावावर निर्णय घ्यायचा असल्याचे अजित पवार म्हणाले.
तसेच यात सरकार नावं ठरवणार नसून यासाठी गठीत केलेली समिती नावे ठरवते. त्यामुळे यामध्ये सरकारच्या हस्तक्षेपाचा कोणताही प्रश्न येत नाही. यात कोणतेही राजकारण नाही. जर याबद्दल विरोधक बोलत असतील तर मागील अनेक काळापासून १२ आमदारांच्या जागांवर अजून राज्यपालांकडून निर्णय झालेला नाही हे योग्य आहे का, असा सवाल अजितदादांनी उपस्थित केला.
Advertisement