शबनम न्यूज : पुणे (दि.२० डिसेंबर) :- १५ डिसेंबर १९७१ रोजी भारत पाकिस्तान युद्धात भारताने पाकिस्तानवर न भूतो न भविष्यती असा विजय मिळवला. १६ डिसें .२०२१ रोजी या घटनेला५० वर्ष पूर्ण झाली.या निमित्त विश्वविख्यात हस्ताक्षर मनो विश्लेषण तज्ञ डॉ .मधुसूदन घाणेकर यांनी पुण्यात सकाळी ८ ते रात्री ८ अशी १२ तास सलग सही यात्रा केली. या यात्रेत त्यांनी जो भेटेल त्याला ‘ भारत माता की जय लिहायला सांगून सही केल्यावर प्रत्येकाच्या सहीवरुन तात्काळ सकारात्मक आणि विनामुल्य स्वभावदर्शन घडवले . सहीयात्रेचा प्रारंभ सकाळी ८ वाजता सारसबाग येथे भारत विकास परिषद सारसबागेचे अध्यक्ष तसेच ट्रव्हलर्स एजेंट असोसिएशन या संस्थेचे अध्यक्ष दीपक पुजारी यांच्या शुभहस्ते करण्यात आला . माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या भाषेत , १६ डिसेंबर हा केवळ भारताचा विजय नसुन हा विश्व विजयाचाच दिवस आहे, असे प्रतिपादन दीपक पुजारी यांनी केले . या प्रसंगी स्वातंत्र्य सैनिक कन्यका जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मंदाताई नाईक , सैनिक पुत्र कवी प्रशांत राजे ,काव्य शिल्प संस्थेच्या विद्यमान अध्यक्षा ऋचा कर्वे, भारत विकास परिषदेचे प्रमोद प्रभू, अनिल येलडा, आदि मान्यवरांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे संयोजन हॅण्डरायटिंग अॅनॅलिसिस रिसर्च फाऊंडेशनच्या सचिव सौ. मेघना घाणेकर यांनी केले.
अजिंक्य भारतीय सैनिकांचा गौरव करताना डॉ. मधुसूदन घाणेकर म्हणाले ” ज्या सैनिकांच्या सह्यांमध्ये गतिमान आणि आत वळणाऱ्या रेघा असतात. असे सैनिक सहजरित्या शत्रुवर विजय प्राप्त करतात.!” आपल्या प्रास्ताविक भाषणात, सहियात्रेचे प्रयोजन विषद करताना डॉ. घाणेकर म्हणाले,” सही करण्याअगोदर भारत माता की जय प्रत्येकाला लिहायला सांगण्या मागचे कारण या निमित्ताने नकळत प्रत्येकाच्या मनावर राष्ट्र प्रेमा विषयीची भावना / राष्ट्रीय अस्मिता अधिकपणे जागृत व्हावी !”
जेष्ठ कार्यकर्ते तानाजी कारळे, तसेच वर्ल्ड व्हिजनचे संपादक अध्यक्ष प्रा. नागेश हुलवळे यांनी या सहीयात्रेस विशेष सहकार्य केले.सौ.प्रतिमा काळे,निगडी प्राधिकरण,पुणे यांनी शुभेच्छा दिल्या.
सारसबाग – महाराणा प्रताप गार्डन – एस.पी. कॉलेज – रामकृष्ण मठ – दांडेकर पुल – पत्रकार भवन – गरवारे कॉलेज – डेक्कन कॉर्नर – संभाजी पार्क मार्गे डॉ. घाणेकरांची सहियात्रा बालगंधर्व रंगमंदिर येथे ८ वाजता समाप्त झाली. आघाडीच्या युवा साहित्यीका ऋचा थत्ते यांच्या विशेष उपस्थितीत सहियात्रेचा समारोप झाला. लहानमुले फेरीवाले रिक्षा ड्रायव्हर गजरेवाले पुजा साहित्य विक्रेते दुकानदार महाविद्यालयीन विद्यार्थी पत्रकार अशा विविध स्तरांवरील सुमारे १५० महिला पुरुषांच्या सह्यांवरून तात्काळ विनामुल्य मनोविश्लेषण केले. काव्यशिल्प तर्फे अध्यक्षा ऋचा कर्वे कवयित्री यांनी या सही यात्रेत डॉ. मधुसूदन घाणेकर यांचा जाहिर सत्कार केला .