वृत्तसंस्था
शबनम न्यूज : पुणे (दि.२८ मार्च) :- आज सोमवारपासून राज्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. कमाल तापमानात 4 ते 6 अंशांनी वाढ होणार आहे. हवामान विभागाने राज्यातील दहा जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा ‘यलो अॅलर्ट’ दिला आहे.
राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरातसह महाराष्ट्रात 28 ते 31 मार्च या कालावधीत हवेच्या उष्ण लहरी सक्रिय होत आहेत. त्यामुळे कमाल तापमान सरासरी 40 ते 41 अंशांवर जाण्याची शक्यता आहे. प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र व उत्तर महाराष्ट्रात कमाल तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.
Advertisement