शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.२६ एप्रिल) :- पावसाळा जवळपास सव्वा महिन्यावर येऊन ठेपला आहे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील नागरिकांना पावसाळ्यामध्ये कोणताही त्रास होऊ नये, कोणताही अपघात घडू नये याकरिता पावसाळ्या पूर्वीची कामे तात्काळ मार्गी लावणे बाबत सुरज गजानन बाबर, अध्यक्ष : कृषी, पर्यावरण, शिक्षण आणि नागरी समस्या निवारण संघटना यांनी पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे.
दिलेल्या निवेदनात बाबर यांनी सांगितले आहे कि,पावसाळा जवळपास सव्वा महिन्यावर येऊन ठेपला आहे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील नागरिकांना पावसाळ्यामध्ये कोणताही त्रास होऊ नये,कोणताही अपघात घडू नये याकरिता महानगरपालिकेने उपाय योजना करणे गरजेचे आहे.
पावसाळा जवळ आल्या कारणाने, रस्त्याच्या कडेने असलेली धोकादायक झाडे छाटून घ्यावीत जेणेकरून कोणताही अपघात होणार नाही, केबल्स, धोकादायक विद्युत वाहिनी, ट्रान्सफॉर्मर याबाबत माहिती विद्युत विभाग महाराष्ट्र शासन यांना आपल्या मार्फत देण्यात यावी, रस्त्याच्या वरती आलेले चेंबर्स रस्त्याच्या लेवलने करून घेण्यात यावे, नदीच्या काठी असणाऱ्या असणार्या घरांना सावधतेचा इशारा व वेळप्रसंगी पूर आल्यास आपली आपत्कालीन टीम सज्ज ठेवण्याबाबत व पूरस्थिती जास्त झाल्यास त्याबाबत विविध उपाययोजना करणे बाबत दक्षता पथक तयार ठेवावे, नाल्यांची साफसफाई असेल, नद्यांमध्ये पडलेला राडारोडा असेल त्याची सफाई ताबडतोब करण्यात यावी, पावसाळ्यात रोगराई पसरते याबाबत प्रतिबंधात्मक उपाय योजना पूर्वीच करून ठेवणे बाबत, पिंपरी चिंचवड मधील रस्त्यांची अपघात होणार नाही म्हणून डागडुजी करण्यात यावी, रस्त्यामधील खड्डे बुजवावेत तरी माननीय महोदय आपण वरील सर्व बाबी या सव्वा महिन्यात तात्काळ मार्गी लावाव्यात जेणेकरून नागरिकांना कोणतेही नुकसान होणार नाही तसेच जीवित हानी व वित्तहानी होणार नाही.असेही सुरज बाबर यांनी म्हंटले आहे.