शबनम न्युज | आळंदी
श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, शरद चंद्र पवार कला आणि वाणिज्य महाविद्यालय, डुडूळगाव आळंदी या ठिकाणी उद्योजकता विकास मार्गदर्शन केंद्रातर्गत शरदचंद्र पवार कला आणि वाणिज्य महाविद्यालय व चावडी ट्रेनिंग अँड कन्सल्टन्सी प्रायव्हेट, लिमिटेड अहमदनगर यांच्याबरोबर सामंजस्य करार, उद्योजकता विकास विभागाचे उदघाटन आणि ” उद्योजकता विकास : एक दिवशीय मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन, प्रतिमापूजन व वैष्णवी पांचाळ, काजल पवार आणि विशाखा म्हसतकर यांच्या स्वागत गीताने झाली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना प्रा. डॉ. राजू शिरसकर यांनी उद्योजकता विकास विभाग स्थापन करण्यामागची भूमिका, उद्देश व ध्येय याबाबत माहिती सांगितली.तसेच पारंपारिक उद्योग यांची जपवणूक करून कौशल्यावर आधारित उद्योग व्यवसायांची निर्मिती करण्यासाठी या शिबिराचे आयोजन विद्यार्थ्यांसाठी करण्यात आले आहे असे मत व्यक्त केले.
यावेळी प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. कैलास अस्तरकर यांनी करून दिला. यावेळी महाविद्यालयातील आजी व माजी विद्यार्थी बळवंत मोरे, शुभम तापकीर, ओंकार बनसोडे, वैभव काटे, सुजित लोखंडे, ज्ञानेश्वर शिंगाडे, सिद्धार्थ पाटील, हेमंत आल्हाट, अनिकेत कुऱ्हाडे, शंतनु पोफळे,भारत कदम,संकेत कुऱ्हाडे, नाना अंबुरे, अक्षय कुऱ्हाडे, अक्षय काशिद या विविध उद्योग व व्यवसाय सुरु करणाऱ्या युवा उद्योजकाचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे उदघाटक व प्रमुख व्याख्याते मा. श्री. अमित मखरे (Founder &CEO Chawadi ) यांनी चावडी ट्रेनिंग अँड कन्सल्टन्सी प्रा. लि.अहमदनगर हे भारतातील उद्योजकता विकासावर मार्गदर्शन करणारे भारतातील पहिले डिजिटल ट्रेनिंग सेंटर आहे असे मत व्यक्त करीत इयत्ता दहावी म्हणजे करिअरला कलाटणी देणारे वर्ष असून कोणताही उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी अपमान सहन करण्याची ताकद व जबाबदारी स्वीकारली पाहिजे असे मत मांडले. कोणताही उद्योग करताना प्रथम मन हे खंबीर असणे आवश्यक असून त्याला प्रयत्नाची जोड व सहनशीलता असावी लागते तसेच कोणताही व्यवसाय करताना त्या व्यवसायाची पार्श्वभूमी, सर्वेक्षण, निर्णय व समायोजन अत्यंत महत्त्वाचे असते. आपल्या आवडीला व्यवसायात रूपांतरित करणे म्हणजे उद्योग सुरू करणे होय. व्यवसाय सुरू करताना अनेक अडचणी, समस्या समोर येतात परंतु त्यावर योग्य तो तोडगा काढून आपले ध्येय निश्चित करणे म्हणजेच यशस्विता होय. पारंपारिक उद्योग व आधुनिक उद्योग यासंदर्भात मत मांडताना मोठमोठे उद्योगपती कशाप्रकारे निर्णय घेतात व यशस्वी होतात या संदर्भात अनेक उद्योगपतींचे दाखले देत मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हंसराज थोरात यांनी उद्योग क्षेत्रात अनेक पर्याय असून ते आपल्या आवडीने स्वीकारावे करावे लागतात असे मत व्यक्त करीत तुम्ही जो उद्योग व्यवसाय सुरु करणार आहात त्यासाठी मी व चावडी ट्रेनिंग सेंटर नेहमी तुमच्या सोबत आहोत असे विद्यार्थ्यांना आश्वासन देऊन शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या नियोजनासाठी श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार मा. श्री. मयूर मुरलीधर ढमाले यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.
या कार्यक्रमाला चावडी ट्रेनिंग सेंटरचे मा. पंकज गोंडकर मा. प्रदीप सोनवणे, मा.सुयोग सोनवणे, मा. योगेश मानगुंडे तसेच महाविद्यालयाचे प्रा. डॉ. पांडुरंग मिसाळ,प्रा. संजीव कांबळे, प्रा. माणिक कसाब, प्रा.शाहूराज येवते, प्रा.शैला वाळुंज, प्रा. डॉ. छाया जोशी, प्रा.डॉ. रणजित कदम, प्रा. विकास दिघे, प्रा. यशोदा खुळखुळे, प्रा. सविता मानके, प्रा. प्रेरणा पाटील, प्रा. सोनाली अभंग, प्रा. विश्वनाथ व्यवहारे इत्यादी विभाग प्रमुख, सहाय्यक प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दिलीप बारी यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. परमेश्वर भत्ताशे यांनी मानले. या कार्यक्रमाची सांगता सामूहिक पसायदानाने झाली. अशी माहिती महाविद्यालयाचे प्रसिद्धी विभाग प्रमुख, प्रा. प्रविण डोळस यांनी दिली.