शबनम न्युज | मुंबई
राज्यसभेच्या सहा जागांसाठी आज (शुक्रवार) मतदान होत आहे.सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात आहेत.आतापर्यंत जवळपास २८१ आमदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. दरम्यान, काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर, शिवसेना आमदार सुहास कांदे आणि राष्ट्रवादी काँग्रसचे आमदार आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप भाजपा नेते पराग अळवणी आणि आशिष शेलार यांनी केला.
संबंधित आमदारांनी राज्यसभा निवडणुकीच्या नियमांचं उल्लंघन केलं असून त्यांची मतं अवैध ठरवावी, अशी मागणी भाजपा नेते पराग अळवणी यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली. पण निवडणूक अधिकाऱ्यांनी पराग अळवणी यांची ही मागणी फेटाळून लावल्याची माहिती समोर येत आहे.
Advertisement