शबनम न्युज | पिंपरी
मागील दोन वर्षापासून देशावरील कोरोनाचे संकट असल्यामुळे संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात पालखी सोहळा झाला नाही. यंदा कोरोनाचे संकट कमी झाल्यामुळे मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात लाखोंच्या संख्येने वारकरी बांधवांनी सहभाग नोंदविला. टाळमृदुंगाच्या जयघोषात विठुरायाचे नामस्मरण कर जगदगुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे दापोडी येथे प्रस्थान झाले. त्याप्रसंगी आलेल्या सर्व वारकरी संप्रदायाचे पार्थ पवार फाऊंडेशनच्या वतीने त्यांच्या आरोग्याची काळजी घेत औषध संच (Medical Kit) व वारी सोहळ्यात वारकरी भक्तांना पावसापासून संरक्षणार्थ २५० पावसाळी रेनकोट वाटप करण्यात आले.
संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्र भूमीत पिंपरी-चिंचवड करांना हा नयनरम्य सोहळ्याची देही याची डोळा पाहत वारकरी संप्रदायाची सेवा करण्याची संधी मिळते. त्याबद्दल आम्ही भाग्यवान समजतो अशी भावना नगरसेवक राजाभाऊ बनसोडे यांनी व्यक्त करत वारकरी सांप्रदायांचे सहर्ष स्वागत केले. त्याप्रसंगी नगरसेवक राजाभाऊ बनसोडे,सौ.प्राजक्ता वाघेश कांबळे, राजू कापुरे,ॲलेक्स दास,मनोज परदेशी,सिद्धाराम म्हेत्रे,प्रमोद वाघमारे,तेजस सरोदे,तानाजी डोईफोडे,शंकर गायकवाड,आकाश नाटेकर,निशांत कामठे,आकाश बोराडे,अतुल गायकवाड,तुषार चाळके,आशिष जगताप,सोमनाथ कामठे,मनोज कुंटे उपस्थित होते.