शबनम न्युज | पुणे
राज्यातील २७१ ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. याबाबतचं परिपत्रक जारी करण्यात आले आहे.
निवडणुका असलेल्या ग्रामपंयचायतीमध्ये, निवडणूक क्रायक्रम जाहीर केल्यापासून निवडणूकीचा निकाल जाहीर होईपर्यंत आचारसंहिता लागू राहिल, असे जाहीर करण्यात आले आहे. या निवडणुकांसाठी नामनिर्देशनाची प्रक्रिया संगणक प्रणालीद्वारे राबवण्यात यावी, असेही निवडणूक आयोगानं जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलेय. सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान होईल.या निवडणुकीदरम्यान कोरोना नियमांचं पालन करण्यात यावे, असेही सांगण्यात आले आहे.
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम (सन १९५९ चा मुंबई अधिनियम क्रमांक ३) मधील कलम १० अ पोटकलम (४) मधील अधिकारांचा वापर करत राज्य निवडणूक आयोगानं २७१ ग्रामपंचायतीच्या निवडणूका जाहीर केल्या आहेत. पाच जुलै रोजी आचारसंहिता लागू होणार आहे. चार ऑगस्ट रोजी मतदान, तर पाच ऑगस्टला मतमोजणी होणार आहे. यामुळे पुढील महिना या ग्रामपंचायत हद्दीत रणधुमाळी गाजणार आहे. राज्यात २८,८१३ ग्रामपंयायती आहेत.
कोणत्या जिल्ह्यात किती ग्रामपंचायचीच्या निवडणूका –
नाशिक – ४०
धुळे – ५२
जळगाव – २४
अहमदनगर – १५
पुणे – १९
सोलापूर – २५
सातारा – १०
सांगली – १
औरंगाबाद १६
जालना – २८
बीड – १३
लातूर -९
उस्मनाबाद – ११
परभणी – ३
बुलढाणा – ५