शबनम न्युज | मुंबई
राज्यात सर्वत्र अतिवृष्टी सुरू आहे. या पार्श्ववभूमीवर आदित्य ठाकरेंचे ट्विट चर्चेत आले आहे. राजकीय परिस्थितीकडे लक्ष न देता युवासैनिकांनी पूरग्रस्त भागात मदत करावी, असं आवाहन आदित्य ठाकरे यांनी ट्विटरद्वारे केलं आहे.
त्यांनी ट्विट मध्ये म्हंटले आहे कि, युवासैनिकांनो! आताच्या राजकीय परिस्थितीकडे लक्ष न देता, जिथे जिथे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे अशा भागात शक्य असेल ती मदत पोहोचवा, मदत कार्य करा… सर्व सामान्य जनता अजूनही आपल्याकडेच आशेने पाहत आहे… जनतेचा विश्वास सार्थ ठरविण्याची “हीच ती वेळ”. असे ट्विट आदित्य ठाकरेंनी केले आहे.
Advertisement