शबनम न्यूज | पिंपरी-चिंचवड
अण्णाभाऊ साठे हे समाजसुधारक आणि क्रांतिकारक विचारसरणीचे लेखक होते. त्यांचा जन्म सांगलीत 1 ऑगस्ट 1920 साली झाला. सर्वसामान्यांना सहज समजेल अशा ग्रामीण भाषेतून शाहीरी करत त्यांनी आयुष्यभर वंचितांसाठी समाजप्रबोधन केले. जातीव्यवस्था आणि गरीबीमुळे ते शिक्षण घेऊ शकले नाही. मात्र अवघी दीड दिवसाची शाळा शिकलेल्या अण्णाभाऊंनी साहित्य क्षेत्रात मात्र खूप मोठी झेप घेतली. लेखणी आणि प्रतिभेच्या बळावर त्यांनी अनेक पुस्तके लिहीली. सिद्धहस्त कादंबरीकार, लोकशाहीर म्हणून त्यांना समाजात आजही मानाचे स्थान आहे. त्यांच्या ‘फकिरा’ कादंबरीला राज्य सरकारचा उत्कृष्ठ कांदबरीचा पुरस्कार मिळालेला आहे. यासोबतच त्यांच्या अनेक कांदबऱ्या प्रसिद्ध आहेत. एवढंच नाही तर त्यांचे साहित्य चौदा भारतीय भाषा आणि इंग्रजी, जर्मन, रशियन अशा अनेक परदेशी भाषेतही प्रसिद्ध आहे. अण्णाभाऊंनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळी; लोकनाट्यांमधून जनजागृतीचे कार्य केले होते. त्यांचे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अत्यंत मोलाचे योगदान लाभले होते. त्यांचे अण्णाभाऊ साठेंचे क्रांतिकारक विचार (Annabhau Sathe Quotes), अण्णाभाऊ साठे कविता आणि अण्णाभाऊ साठे शायरी, पोवाडे आजही अभिमानाने गायले जातात. त्यांचे ‘माझी मैना’ हे मुंबईबद्दल लिहिलेलं गीत आजही अजरामर आहे.आपला संयुक्त महाराष्ट्र बलशाली होण्याकरिता प्रत्येक नागरिकाने सज्ज असावे असे मत शहराध्यक्ष धम्मराज साळवे यांनी व्यक्त केले .
लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त ऑल इंडिया मजलिस‑ए‑इत्तेहादुल मुस्लिमीन (एम आय एम ) पक्ष पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने शहराध्यक्ष धम्मराज साळवे ,महिला शहराध्यक्ष रुहीनाज शेख ,पुणे जिल्हाध्यक्ष फैयाज शेख ,सचिव कुतुबुद्दीन होबळे यांनी लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी पक्षाचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते .