शबनम न्युज | मुंबई (वृत्तसंस्था)
मुंबईवर २६/११ सारखा हल्ला करण्याची धमकी देणारा संदेश वाहतूक नियंत्रण विभागाच्या व्हॉट्सॲप नंबरवर आला आहे. हा संदेश पाकिस्तानमधील मोबाईल क्रमांकावरून आल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. एकूण ६ जण हा हल्ला करणार असल्याचं संदेशात नमूद केलं आहे.त्यामुळे सर्व पोलीस ठाणे व यंत्रणा सज्ज करण्यात आल्या आहेत. दरम्यान, “अशा प्रकारच्या धमक्यांना गांभीर्याने घेतले पाहिजे”, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
ते म्हणाले, अनेकदा अशा धमक्या येतात. मुकेश अंबानी यांच्या कुटुंबाला देखील अशी धमकी देण्यात आली होती. या प्रकरणाच्या खोलात गेल्यानंतर कळाले की, काही माथेफीरू, विकृत लोकं अशा प्रकारे बोलतात. मुंबईला पुन्हा मिळालेली दहशतवाद्यांची धमकी गांभीर्याने घेतली पाहीजे. आपली पोलीस यंत्रणा सक्षम आहे. अशा धमक्या जेव्हा येतात तेव्हा केंद्रानेसुद्धा यामध्ये लक्ष दिले पाहिजे. सरकार ही धमकी गांभीर्याने घेईल, अशी अपेक्षा करुया, असे अजित पवार म्हणाले.