शबनम न्युज | पुणे
आकुर्डी येथील डॉ. डी. वाय. पाटील कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयात विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावं लागत असून त्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने केलेला आहे. आणि त्या संबंधाची तक्रार त्यांनी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे संचालक उत्तम कदम यांच्याकडे आज निवेदन देऊन केली.
संबंधित महाविद्यालयातील काही विदयार्थ्यांनी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस चे पश्चिम महाराष्ट्र कृषी चे विभागीय उपाध्यक्ष विनोद भांगे यांना सदर महाविद्यालयाततील अडचणी निदर्शनास आणून दिल्या,हे महाविद्यालय पुण्यातील नामांकित महाविद्यालय मानले जाते. परंतु शैक्षणिक वर्ष 2021- 22 मध्ये जे विद्यार्थी शिक्षण घेत होते त्यांची EBC ही शिष्यवृत्ती दोन हप्त्यांमध्ये शासनाने विद्यार्थ्यांना दिली. पहिला हप्ता साधारणता नोव्हेंबर 2021 मध्ये महाविद्यालयाच्या खात्यामध्ये जमा झाला व त्यानंतर दुसरा हप्ता हा साधारणता मार्चमध्ये जमा झाला. परंतु यामध्ये बाकीच्या सर्व महाविद्यालयांनी जसे शासनाकडून पैसे आले तसे ते विद्यार्थ्यांच्या खात्यावरती जमा केले. मात्र डी वाय पाटील महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांनी विचारणा करूनही महाविद्यालयाकडून पाच-सहा महिने शिष्यवृत्ती चा हप्ता विद्यार्थ्यांना देण्यात आलेला नाही व सदर बाब संस्थेच्या विश्वस्तांच्या कानावर घातल्यानंतरही त्यांच्याकडून उडवा उडवीची उत्तरे देण्यात आली व महाविद्यालय प्रशासनाकडून देखील दहा-पंधरा दिवसात आम्ही शिष्यवृत्ती जमा करून परंतु अध्याप देखील विद्यार्थ्यांना ते पैसे मिळालेले नसून फक्त विद्यार्थ्यांना न शोभेल अशी भाषा बोलली जाते आणि हा फक्त एकाच बॅच ची अडचण नसून असे प्रकार गेले अनेक वर्ष वारंवार चालत असल्याचे आरोप राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने केले. महाविद्यालयाच्या ढिसाळ कारभारामुळे शासनाकडून संस्थेला विद्यार्थ्यांच्या हक्काचे पैसे मिळालेले असतानाही ते विद्यार्थ्यांना महाविद्यालयाने न दिल्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा मनस्तापाला सामोरे जायला लागत असल्याचे अनेक विद्यार्थ्यांनी सांगितले.
त्याचबरोबर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस कडून महाविद्यालयाच्या फी आकारणीबाबतही काही आक्षेप घेतले जात आहेत. यामध्ये स्टुडंट सेफ्टी इन्शुरन्स साठी विद्यार्थ्यांकडून साधारणपणे प्रत्येकी 1104 घेतले जातात. परंतु विद्यार्थ्यांना या संदर्भात त्याचा काहीच पुरावा भेटत नाही किंवा इन्शुरन्स काढला आहे का नाही हे समजत नाही. त्याचबरोबर वैद्यकीय तपासणीसाठी विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी दोनशे रुपये घेतले जातात परंतु चार वर्षांमध्ये एकदा देखील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी झाले नसल्याचे विद्यार्थी सांगतात. त्यामुळे या सगळ्या घटकांची चौकशी करून त्याचे पुरावे महाविद्यालयाने सादर करावे अन्यथा महाविद्यालयावरती योग्य ती कारवाईची मागणी देखील यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने केली.
त्याचबरोबर हे महाविद्यालय कृषी व्यवसाय व्यवस्थापनाचे व्यावसायिक शिक्षण देणारे महाविद्यालय असून या महाविद्यालयामार्फत पाहिजे त्या प्रमाणात इंडस्ट्रियल व्हिजिट होत नाहीत.विद्यार्थ्यांना एकदाही फिल्ड वरती प्रात्यक्षिक शिक्षण देण्यासाठी नेलं जात नाही. आणि हे शेती महाविद्यालय असताना देखील शेती महाविद्यालयासाठी आवश्यक असणाऱ्या शासन नियमानुसार या महाविद्यालयाकडे शेती आहे का नाही याचीही कल्पना विद्यार्थ्यांना नाही. असे आरोप राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने केले.
आणि वरील आरोपांची गांभीर्याने दखल घेऊन महाविद्यालयावरती कठोर कारवाई करावी किंवा शक्य असल्यास सदर महाविद्यालयाची मान्यता रद्द करावी अशी मागणी देखील राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे संचालक यांच्याकडे केली असता त्यांनी सदर विषय चार पाच दिवसांत मार्गी लावून विद्यार्थ्यांच्या खात्यावर त्यांचे हक्काचे पैसे जमा होतील असे आश्वासन दिले, यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस चे प्रदेश सचिव सोमनाथ लोहार, पिंपरी विधानसभा अध्यक्ष मयूर कांबळे, कार्याध्यक्ष अरबार शेख, प्रथमेश कांबळे उपस्थित होते