वाघोलीची ही स्वतंत्र नगरपालिका करण्याची ग्रामस्थांची मागणी
शबनम न्युज | पुणे okbet asia
पुणे महानगरपालिकेमध्ये अवघ्या पाच वर्षांपूर्वी समाविष्ट झालेले उरुळी-देवाची आणि फुरसुंगी ही दोन्ही गावे महापालिकेतून वगळण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. या गावात विकास कामे सुरू असल्याने ही गावे वगळू नयेत, अशी भूमिका महापालिकेने मांडली. पण ग्रामस्थांच्या भावना लक्षात घेऊन गावे महापालिकेतून वगळण्याचे निर्णय घेतला गेला. पुढील पंधरा दिवसात या संदर्भातील आदेश निघणार आहेत. तसेच आता उरुळी-देवाची, फुरसुंगीच्या धर्तीवर वाघोली गाव देखील पुणे महानगपालिकेतून वगळून स्वतंत्र नगरपालिका करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. OKBET/a>
पुणे महानगरपालिकेमध्ये २०१७ मध्ये ११ गावांचा समावेश करण्यात आला. यामध्ये उरुळी-देवाची आणि फुरसुंगी या दोन गावाचा समावेश आहे. हे गावे महापालिकेत समाविष्ट झाल्यानंतर महापालिकेने मिळतकर आकारणी सुरू केली. गावात मूलभूत सुविधांचा अभाव असताना कर घेतला जात असल्याने त्यावर नागरिकांनी आक्षेप घेतला होता. माजी मंत्री विजय शिवतारे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे या संदर्भात तक्रार करत उरुळी-देवाची आणि फुरसुंगी यांची स्वतंत्र नगरपरिषद करावी, तसेच ही दोन्ही गावे महापालिकेतून वगळण्यात यावी, अशी मागणी केली होती. या नगरपालिकेच्या माध्यमातून या गावातील नागरिकांच्या नागरी सुविधांचा प्रश्न मार्गी लागेल तसेच नागरिकांच्या सहभागातून ही नगरपालिका विकास कामांमध्ये सर्वोत्कृष्ट ठरेल, असे मुख्यमंत्री यांनी यावेळी सांगितले.okbet football
फुरसुंगी व उरुळी-देवाची गावाप्रमाणेच पुणे महानगरपालिकेतून वाघोली हे गाव वगळावे, या गावकऱ्यांच्या मागणीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे व लवकरच याबाबत कार्यवाहीचे आदेश देणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संकेत दिले.okbet boxing