शबनम न्यूज (मुंबई )
मनसेचे राज ठाकरे यांनी काल गुढीपाडवा निमित्त केलेल्या भाषणात मुंबई येथील माहीम स्थित मजार ही अनधिकृत असून ती तोडावी अन्यथा आपण त्या बाजूलाच गणपतीचे मंदिर उभारून असा इशारा दिला होता त्यांनी दिलेल्या इशारा नंतर 24 तासातच मुंबई महापालिका वतीने अतिक्रमण हटाव मोहिमेअंतर्गत माहीम येथील मजार तोडण्यात आली मजार महिन्याभरात न हटवल्यास त्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही राज ठाकरे यांनी दिला होता. राज ठाकरे यांच्या इशाऱ्याला 24 तास उलटत नाही तोच मुंबई महापालिका, जिल्हाधिकारी आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने अखेर हे अतिक्रमण हटवले आहे. खाडीतील मजारच्या जागेवरील हिरवा झेंडा हटवण्यात आला आहे. तसेच अनधिकृत मजारवर जेसीबी मशीन फिरवण्यात आली आहे. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
राज ठाकरे यांनी काल इशारा दिल्यानंतर कालच पोलिसांनी संबंधित मजारवर जाऊन पाहणी केली होती. जिल्हाधिकाऱ्यांनीही तात्काळ ते अनधिकृत बांधकाम हटवण्याचे आदेश दिले होते. हे अनधिकृत बांधकाम हटवण्यासाठी सात जणांचं पथक तयार करण्यात आलं होतं. आज सकाळी 8 वाजता पोलीस, जिल्हाधिकारी प्रशासन आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन ही कारवाई केली. कारवाई करताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
यावेळी पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी जेसीबी मशीनच्या सहाय्याने अनधिकृत मजार जमीनदोस्त करण्यात आली. सर्वात आधी या मजारीवरील झेंडा हटवण्यात आला. त्यानंतर तोडक कारवाई करण्यात आली. अवघ्या अर्ध्या तासात ही संयुक्त कारवाई करण्यात आली आहे. या ठिकाणी पुन्हा बांधकाम होऊ नये म्हणून पोलीस आणि पालिकेचा वॉच राहणार असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, तोडक कारवाईवेळी कोणताही अडथळा आला नाही. कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.