शबनम न्युज | चिंचवड
कार्यक्रमाच्या सुरुवातीस श्री आलोक गायकवाड आणि श्री चिंतामणी कुलकर्णी यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
श्री बी आर माडगूळकर, श्री शाम तांबे आणि सौ.माया तांबे यांनी परिवर्तनाची गाणी सादर केली. या प्रसंगी श्री. बी आर. माडगूळकर म्हणाले,” डाँ. आंबेडकर यांनी ” शिका, संघटीत व्हा आणि अन्यायाविरुद्ध संघर्ष करा”, हा संदेश दिला.शिक्षणामुळेच माणसाचे जीवन बदलते.आपण जे आज आहोत, ते केवळ आपण घेतलेल्या शिक्षणामुळे.डाँ आंबेडकरांनी अनेक पदव्या अभ्यास करून, परिश्रमघेऊन संपादन केल्या. शिक्षणाचे महत्व त्यांनी स्वत:च्या अध्ययनातून दाखवून दिले ते क्रुतीशील विचारवंत होते.त्यांनी ‘भारताच्या राष्ट्रीय नफ्याचा वाटा’,रूपयाचा प्रश्न,प्राचीन भारतातील व्यापार,हिंदुत्वाचे गूढ, भारतीय जातीसंस्था,शूद्र पूर्वी केण होते?, पाकिस्तान म्हणजे काय? बुद्ध आणि त्याचा धम्म, बुद्ध आणि कार्ल मार्क्स,जाती व्यवस्थेचा उच्छेद,रामक्रुष्णाचे कोडे,भारतीय राज्यघटना असे अनेक ग्रंथ लिहिले,यावरुन त्यांचा व्यासंग,चिंतन,मनन आणि त्यांच्या बुद्धीची झेप दिसून येते.”
याच वेळी श्री.चद्रकांत सहाने, श्री. चिंतामणी कुलकर्णी यांनी डाँ आंबेडकर य़ांच्या जीवनातील अनेक पैलूंवर प्रकाश टाकला.श्रीमती स्मिता गायकवाड यानी अंध अपंग विकास असोसिएशन ही संस्था लाोकाश्रयावर चालू असल्याचे सांगितले.श्री आलोक गायकवाड यांनी उपस्थितांचे आभार मानले.