रुग्णालयात उपचार घेत असलेल्या नागरिकांची राज ठाकरे यांनी घेतली भेट
शबनम न्युज | मुंबई
“राज्य सरकारला घडलेला प्रसंग टाळता आला असता, सकाळी कार्यक्रम करणं गरजेचं नव्हतं. राजभवनावर बोलावून आप्पासाहेब धर्माधिकारी यांना पुरस्कार देता आला असता, पण सध्या झालेली गोष्ट ही दुर्देवीच आहे. कार्यक्रम सकाळी न करता संध्याकाळी झाला असता, तर हे टाळता आलं असतं. मात्र कोणी हे मुद्दामून केलेलं नाही. इतरांना जसा पुरस्कार देतात तसाच राजभवनावर बोलवायला हवं होतं, असं मला वाटतं. या कार्यक्रमामागे राजकीय स्वार्थ असल्याशिवाय एवढी माणसे बोलावली जातात का?” अशी प्रतिक्रिया मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली आहे. त्यांनी आज महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याच्या दरम्यान झालेल्या घटनेतील उपचार घेत असलेल्या रुग्णांची भेट घेतली. त्यावेळेस त्यांनी राज्य सरकारवर टीका देखील केली.
काल राज्य सरकारच्या वतीने ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना नवी मुंबईत महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. केंद्र गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात भल्या मोठ्या संख्येने श्री सदस्य उपस्थित होते. त्यापैकी काही सदस्यांना उष्माघातामुळे रुग्णालयात हलवावे लागले. दरम्यान दुर्दैवाने त्यातील 12 जणांचा उपचार सुरू असतानाच मृत्यू झाला, तर काही रुग्णांचा उपचार सुरू आहे. मृत्युमुखी झालेल्याच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्यात येणार असून, उपचार सुरू असलेल्यांचा खर्च शासनामार्फत केला जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
दरम्यान, “मी हॉस्पिटलला गेलो. तिथे जी लोकं होतं त्यांना भेटलो. ICU मध्ये बरीच लोकं आहेत, तिथे मी गेलो नाही. ICU मध्ये जायचं नसतंच. कारण त्या लोकांची अवस्था नाजूक असते. मी हॉस्पिटलमधील स्टाफशी बोललो. ७१ जणांवर उपचार सुरू आहेत. त्यातील दोन जण दगावलेत, पण हॉस्पिटलमधील सर्व लोक त्यांचं काम करत आहेत,” असेही राज ठाकरे म्हणाले.
काल ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी ह्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान झाला, ही अतिशय आनंदाची बाब आहे. हा पुरस्कार जेंव्हा घोषित झाला तेंव्हा मी आप्पासाहेबांचं आणि सरकारचं अभिनंदन केलं होतं. पण ह्या सोहळ्याला जे गालबोट लागलं ते टाळता आलं नसतं का ? कधी नव्हे ते…
Advertisement— Raj Thackeray (@RajThackeray) April 17, 2023