शबनम न्युज | पुणे
राज्यात मोठ्या प्रमाणात उष्णतेचा कहर पाहावयास मिळत आहे. उष्णतेमुळे अनेक नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास देखील सहन करावा लागत आहे. विशेषत: लोणवळ्यासारख्या हिल स्टेशनलाही उष्णतेच्या लाटेचा तडाखा बसला असून, येथे कमाल तापमानाची नोंद ३७ अंश सेल्सिअस झाली आहे.
शनिवारपर्यंत मुंबईसह राज्यभरात कमाल तापमानाचा पारा चढाच राहील, अशी माहिती वेगरिज ऑफ दी वेदरचे राजेश कपाडीया यांनी दिली. आता उत्तर भारतात उष्णतेच्या लाटेचा तडाखा बसत असून, मुंबईसह राज्यभरात शनिवारपर्यंत कमाल तापमान चढे राहण्याची शक्यता आहे. रविवारनंतर हवामानात पुन्हा बदल होतील, असेही कपाडीया यांनी सांगितले.
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेसदृश्य स्थिती होती. रायगड, ठाणे, रत्नागिरी, पुणे, सोलापूर, धाराशीव, लातूर, नांदेड, हिंगोली, धुळे, अमरावती, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया जिल्हयांत ४० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली आहे, असे सतर्ककडून सांगण्यात आले.