‘लोक माझे सांगाती’ आवृत्तीमध्ये अनेक विषयावर शरद पवारांचे भाष्य
शबनम न्युज | मुंबई
आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांचं आत्मचरित्र ‘लोक माझे सांगाती’च्या सुधारित आवृत्तीचे प्रकाशन झाले. या आवृत्तीमध्ये पहाटेचा शपथविधी, जून महिन्यातील सत्तांतर, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाबतही या पुस्तकात भाष्य केले गेले आहे.
नुकतेच शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पदावरून निवृत्त होण्याची घोषणा केली. यापूर्वी त्यांनी आत्मचरित्र म्हणून लोक माझे सांगाती या पुस्तकाचे प्रकाशन केले. या पुस्तकात शरद पवारांनी अनेक विषयांवर भाष्य केलं आहे. तसेच अनेक खुलासे देखील पवारांनी या पुस्तकात केले आहेत.
यामध्ये 2019 च्या राज्य विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेबाबत शंका असल्याने राष्ट्रवादीला बरोबर घेऊन सरकार स्थापन करता येईल का? याची चाचणी भाजपने सुरू केली होती. दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये अनौपचारिक पातळीवर संवादही झाला होता. “मी शरद पवार यांचे बोट धरून राजकारणात आलो”, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानाने खमंग राजकीय चर्चा झाली होती. शिवसेनेबाबत मोदी यांना फार आपुलकी नव्हती, या उलट राष्ट्रवादी काँग्रेसने बरोबर यावे म्हणून मोदी अनुकूल होते. विशेष म्हणजे राष्ट्रवादीतील काही नेत्यांची भाजप बरोबर जाण्याची इच्छा होती, असा धक्कादायक खुलासा शरद पवार यांनी लोक माझे सांगती पुस्तकात केला आहे.