शबनम न्युज | रहाटणी
न्यू सिटी प्राईड स्कूलमध्ये बुद्ध पौर्णिमा साजरी करण्यात आली या वेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार, सामाजिक कार्यकर्ते रुपेश चांदेरे , संदीप कांबळे, अनिल गावडे, शाळेतील शिक्षक फहाद खान, रहीम शेख व शाळेचे उपमुख्याध्यापक सचिन कळसाईत उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बुद्ध मूर्तीला पुष्प अर्पण करण्यात आली व सामूहिक बुद्ध वंदना झाली. शिक्षक फहाद खान सर यांनी गौतमबुद्ध याच्याबद्दल माहिती सांगितली.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संस्थेचे संस्थापक श्री अरुण चाबुकस्वार यांनी गौतम बुद्धा बद्दलचे विचार मांडताना बुद्ध म्हणाले “मी देव नाही किंवा त्याचा दूत नाही. ईश्वर आहे की नाही त्यापेक्षा माणूस आहे आणि त्याचे प्रश्न महत्वाचे आहेत, आणि ते सोडवण्याचा मार्ग आहे, तो मार्ग म्हणजेच अष्टांगिक मार्ग होय. दुःखी जीवनाला चमत्काराने किंवा कर्मकांडाने नव्हे, तर प्रयत्नाने सुखी बनवता येते” असे मत मांडले. सूत्रसंचालन शिक्षिक फहाद खान यांनी तर रहीम शेख यांनी आभार मानले.