शबनम न्युज | मुंबई
आजचा निकाल आगामी निवडणुकांचे चित्र स्पष्ट करणारा आहे. खोक्याचे राजकारण जनतेला आवडले नाही. कर्नाटकच्या निकालाबाबत काँग्रेसचे अभिनंदन करतो, असे म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस पक्षाचे अभिनंदन केले आहे.
आज कर्नाटक विधानसभेचा निवडणुकीचा निकाल पार पडला. यामध्ये काँग्रेसने भाजपचा पराभव करत दणदणीत विजय मिळविला. त्यांनतर सर्व स्तरातून प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान शरद पवार यांनी यासंदर्भात आपली पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली.
Advertisement
ते म्हणाले, महाविकास आघाडीची पुढील आखणी आत्ताच बसून करावी असा विचार माझ्या मनात आहे. लोकांनी भाजपाला नाकारले आहे. कर्नाटक, तामिळनाडू, पंजाब, केरळ, तेलंगणा, आंध्रप्रदेश, राजस्थान इथं भाजपा सरकारला नाकारले. हळूहळू देशाची स्थिती बदलेल, असे ही शरद पवार म्हणाले.