शबनम न्युज | पिंपरी
कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला असून, या निवडणुकीत काँग्रेसचा दणदणीत विजय झाला असून, भाजपचा पराभव झाला आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादीचे युवक शहराध्यक्ष इमरान शेख यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
त्यांनी आपली प्रतिक्रिया देताना सांगितले आहे कि, “कर्नाटक चा निकाल बघता बजरंग बली हे अन्याय विरोधात कायम सत्या सोबत राहिल्याचे रामायण सांगते…त्यामुळे जाती-धर्मा वरून समाज तोडणाऱ्या भाजपला बजरंग बली पावण्याचा विषयच येत नाही, देशाच्या जनतेने ठरवले तर मीडिया द्वारे केला गेलेला आक्रमक प्रचार, चित्रपटाद्वारे पेरला गेलेला विखार, खोटे बोल पण रेटून बोल ची नीती, सरकारी यंत्रणांचा केलेला दुरुपयोग सर्व काही निष्प्रभ ठरून सत्याचा विजय होऊ शकतो. त्याच प्रमाणे एकदा जनतेने विकासावर मतदान करायचे ठरवल्यावर बी टीम,सी टीम, ते झेड टीम सर्वांचा बाजा वाजू शकतो हा कर्नाटकातील जनतेने देशाला दिलेला कौल आहे.
विरोधी पक्ष एकत्र आले तर धर्माच्या नावा खाली देश विकणारे,द्वेष पसरवणारे कुठेही टिकू शकत नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.. असे राष्ट्रवादीचे पिंपरी चिंचवड शहर युवक अध्यक्ष इमरान शेख यांनी आपली प्रतिक्रिया देताना सांगितले आहे.