शबनम न्यूज | मुंबई
भ्रष्टाचार प्रकरणी एनसीपीचे माजी संचालक समीर वानखेडे यांच्यावर सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. या विरोधात आज 22 मे रोजी उच्च न्यायालयात याप्रकरणी सुनावणी झाली, तेव्हा न्यायालयाने समीर वानखेडे यांना अटके पासून दिलासा दिला आहे. याप्रकरणी 8 जूनला आता सुनावणी होणार आहे.
सोमवारी 22 मे उच्च न्यायालयात या प्रकरणी सुनावणी पार पडली. तेव्हा न्यायालयाने समीर वानखेडे यांना काही अटींवर ८ जून पर्यंत अटकेपासून दिलासा दिला आहे. प्रकरणाशी संबंधित पुरावे माध्यमांना उपलब्ध करून देऊ नये, अन्यथा सीबीआयने कारवाई करावी, असे उच्च न्यायालय म्हटले आहे. तसेच तपासात सहकार्य आणि पुराव्यांशी छेडछाड करणार नाही, तसेच तपासाशी संबंधित पुरावे, माध्यमांना उपलब्ध न करून देणार नाही, अशी हमी समीर वानखेडेनी उच्च न्यायालयात दिली आहे.
समीर वानखेडे यांच्याकडे एनसीबीच्या मुंबई विभागीय संचालक पदाची जबाबदारी असताना त्यांच्या पथकाने ऑक्टोबर 2019 मध्ये मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूज वर छापा घातला होता. या कारवाईत अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान यालाही ताब्यात घेण्यात आले होते, त्याला सोडवण्यासाठी समीर वानखेडे यांनी 25 कोटींच्या खंडणीची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी आता समीर वानखेडे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.