शबनम न्युज | मुंबई
“बदलती जीवनशैली, ताण-तणाव यावर मात करण्यासाठी योग आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येकांनी योग अंगीकारत योगसाधनेला लोक चळवळ बनवावी”, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.
वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय, ग्राहक संरक्षण, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालय, वस्त्रोद्योग मंत्रालय,मुंबई बंदर प्राधिकरण पतंजली योग समिती मुंबई,भारत खाद्य निगम ईसीजीसी लि.सीप्झ-सेझ मुंबई, सीआयसीएफ, यांच्या संयुक्त विद्यमाने आंतराष्ट्रीय योग दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन गेटवे ऑफ इंडिया येथे करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल, मुंबई पोर्ट ट्रस्टचे राजीव जलोटा, टाटा मेमोरियलचे डॉ. अमित गुप्ता, पतंजली समूहाचे अध्यक्ष सुरेश यादव, धर्मवीर शास्त्री तसेच विविध शाळेतील विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.