मुंबई : प्रतिनिधी :
राष्ट्रवादीच्या फुटी नंतर आज प्रथमच अजित पवार व शरद पवार यांचे शक्ती प्रदर्शन करणाऱ्या बैठका संपन्न होत आहेत, अजित पवार यांच्यासोबत चाळीस आमदारांचा पाठिंबा असल्याचे सांगितले जात आहे अजित पवार यांची बैठक सभा मुंबई मधील एम इ टी भवनात झाली या बैठकीत अजित पवार यांनी आपल्या भाषणात शरद पवार यांना विनंती केली आहे की त्यांनी आता आराम करावा व हट्टीपणा करू नये तसेच आमच्या राजकीय वाटचालीकरिता आशीर्वाद द्यावा असे अजित पवार यांनी आपल्या भाषणात सांगितले. अजित पवार यांनी आपल्या भाषणात अनेक मुद्दे स्पष्ट केले. या बैठकीला राष्ट्रवादीचे छगन भुजबळ सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल धनंजय मुंडे,रुपाली चाकणकर यांच्या सह अनेक नेते आमदार खासदार व्यसपीठावर होते
अजित पवार यांच्या भाषणातील मुद्दे :
पक्षाच्या आजच्या महत्त्वाच्या बैठकीला उपस्थित असणाऱ्या सर्वांचे स्वागत अजित पवार यांनी केले. राजकीय जीवनात काम करताना शरद पवार हे सर्वांचे श्रद्धास्थान आहे. आज केंद्रात किंवा राज्यात जे राजकारण चालले आहे. त्यातून महाराष्ट्र राज्यातील सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी सर्व जाती धर्मातील नागरिकांना जनतेला न्याय देण्यासाठी आम्ही भाजप सोबत जाण्याचा निर्णय घेतला
1999 मध्ये राष्ट्रवादीची स्थापना करण्यात आली, मी कधी जातीपातीचे राजकारण केलं नाही. सर्वसामान्य जनतेला न्याय मिळावा यासाठीच कार्य केले आपला महाराष्ट्र पुढे गेला पाहिजे देशातला एक नंबर राज्य झाला पाहिजे हे माझं स्वप्न आहे आणि त्या पद्धतीने मी माझे काम करत आहे.
राष्ट्रवादीने 2004 मध्ये राष्ट्रवादीला मुख्यमंत्री पदाची संधी मिळाली असती तर राष्ट्रवादी पक्ष हा राज्यातला एकनम्बर पक्ष झाला असता परंतु आपण ती संधी गमावली आपले आमदार जास्त निवडून आले असतानाही आपल्याला ती संधी गमवावी लागली.
मी सर्व नेतेमंडळींच्या सहकार्याने मतदारांच्या आशीर्वादाने सर्व कार्यकर्त्यांच्या साथीने माझे काम पुढे नेत राहणार आहे.
राष्ट्रवादीच्या आमदारांची वर्षानुवर्ष संख्या कमी होत चालली, खासदारही संख्येने कमी होत चालले परंतु आपला पक्ष वाढला पाहिजे ही माझी प्रामाणिक इच्छा होती मी अनेकदा बोलूनही दाखविले आपला पक्ष वाढला पाहिजे यासाठी जोमाने काम करायला हवे.
आज जो राष्ट्रवादी ने निर्णय घेतला आहे. शिंदे शिवसेना, भाजप व राष्ट्रवादी सरकार मध्ये राष्ट्रवादीला मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत.
राष्ट्रवादीतील सर्वच आमदार माझ्या संपर्कात आहेत. पुढील काळा त काम करण्यात कोणत्याही आमदारांशी मी भेदभाव करणार नाही.
माझी ओळख दबंग नेता अशी झाली आहे असे झाले तरी मी कोणाबरोबरही भेदभाव करणार नाही सर्वांचीच कामे करण्यासाठी मी हा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्रातील बेरोजगारी कमी करणे उद्योगधंदे वाढविणे यासाठी मी काम करणार आहे.
सत्तेमध्ये आल्यानंतर आपल्याला सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविता येतात मग सत्तेत का यायचे नाही? 2014 मध्ये आपण भाजपला बाहेरून पाठिंबा दिला.
2017 मध्ये वरिष्ठांनी निर्णय घेतला भाजपबरोबर खातेवाटप संदर्भात चर्चा झाली मी खोटे बोलणार नाही खोटे बोललो तर मी पवारांची अवलाद नाही, भाजपने पंचवीस वर्षाचा आमचा मित्र शिवसेनेला आम्ही सोडणार नाही असे सांगितले परंतु आपल्या वरिष्ठांना ते मान्य नव्हतं शिवसेना चालणार नाही असे वरिष्ठांनी सांगितल्यानंतर चर्चा बारगळली
2019 मध्ये ही भाजप सोबत जाण्या संदर्भात चर्चा झाली. आणि अचानक वरिष्ठांनी सांगितले की आपण शिवसेनेबरोबर जाऊ महाविकास आघाडी तयार करू.
कोरोना काळात आपण सक्षमपणे काम केले
एकनाथ शिंदेंनी वेगळी भूमिका घेतली, त्याच वेळेस राष्ट्रवादीच्या सर्वच आमदारांनी वरिष्ठांना पत्र दिलं भाजप सोबत जाऊ सरकारमध्ये गेल्या केली सर्वसामान्य जनतेची कामे होणार नाही या पत्रात सर्वच 53 आमदारांनी सह्या केल्या. एकनाथ शिंदेंचा शपथविधी झालेला नव्हता त्यावेळेस राष्ट्रवादीचे सर्व आमदार भाजप सोबत जाण्यास तयार होते परंतु वरिष्ठांनी आपला निर्णय बदलला व आम्हाला सर्वांना थांबवले.
आजही शरद पवार माझे दैवत आहेत माझे श्रद्धास्थान आहेत
आम्ही पवारांच्या पोटी जन्माला आलो ही आमची चूक आहे का भाजपमध्ये 75 व्या वर्षी राजकीय निवृत्ती घेतली जाते,
माझं काय चुकलं असेल तर सांगा मी माझी चूक सुधारेल परंतु मला जनतेसमोर विलन करू नका असे भावनिक भाषण अजित पवारांनी केले
शरद पवार यांना उद्देशून तुमचे वय 83 झाले तुम्ही थांबणार आहात की नाही? तुम्ही आशीर्वाद द्या असे अजित पवार यांनी सांगितले
शरद पवार यांनी सांगितले मी राजीनामा देतो आणि सुप्रियाला आपण राष्ट्रीय अध्यक्ष करू, यासाठीही मी तयार झालो त्यानंतर सांगितलं की मी राजीनामा मागे घेतो ,,,,,,,,जर राजीनामा मागे घ्यायचा होता तर राजीनामा दिलाच कशाला असाही प्रश्न अजित पवार यांनी शरद पवार यांना आपल्या भाषणात विचारला
मी एक कार्यक्षम नेता म्हणून महाराष्ट्रात नावाजलेला आहे मग मला पक्षात संधी का दिली जात नाही.
सगळे आमदार मला विनंती करायचे की दादा काहीतरी करा त्यातून महाराष्ट्राच्या विकासासाठी आम्ही हा मार्ग निवडला
मोदींचा जलवा आजही कायम आहे 2014 पासून आतापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सक्षमपणे देशाला पुढे नेत आहेत आपण भाजपला पाठिंबा द्यायला काय हरकत आहे , सक्षम नेतृत्व असल्याशिवाय देश पुढे जात नाही.
राष्ट्रवादीच्या अनेक बैठकात वरिष्ठांकडून आम्हाला सांगण्यात आले की 2024 मध्ये मोदी सरकारच येणार
मला मनापासून वाटते मी राज्याचा प्रमुख व्हावे मी महाराष्ट्र जनतेला एक विश्वास देतो की राष्ट्रवादी आपल्या सगळ्यांना पुढे न्यायचा आहे आपल्या पक्षाची राष्ट्रीय मान्यता रद्द झाली आहे ते आपल्याला परत मिळवायचे आहे.
2024 मध्ये राष्ट्रवादीचा आमदारकीचा आकडा 71 पेक्षा जास्त पुढे नेण्याचा आपल्या सगळ्यांचा प्रयत्न असणार आहे
आजही माझे दैवत शरद पवार यांना विनंती आहे की त्यांनी आम्हाला आशीर्वाद द्यावा.
वरिष्ठांनी जर आमच्या विरोधात सभा घेतली तर आम्हालाही सभा घ्यावी लागेल आम्हालाही उत्तर द्यावे लागेल
आपल्या राज्यात अनेक प्रश्न आहेत बेरोजगारी आहे उद्योग धंदे आहेत शेतमालाला योग्य भाव मिळत नाहीये अनेक फळबागांचा प्रश्न आहे. अनेक विकास कामे रखडली आहेत. सगळी प्रश्न सोडवायचे आहेत यासाठीच हा आमचा भाजप सोबत जाण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.
शरद पवारांना विनंती आहे की त्यांनी आराम करावा एवढा हट्टीपणा करू नये. आम्हाला आशीर्वाद द्यावा.
मी कोणत्याही कार्यकर्त्याला माझ्या जीवात जीव असेपर्यंत अंतर देणार नाही.
एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस व माझ्या सहकाऱ्यांना घेऊन मी राज्यातील सर्व प्रश्न सोडवून राज्याचा विकास च करणार
2024 मध्ये नरेंद्र मोदी शिवाय पर्याय नाही. आपल्या पक्षाचे आमदार वाढविण्याचे आमचे धेय आहे. आपल्या विरोधात अनेक पक्ष आहेत
मी कोणाचाही अपमान केलेला नाही मी माझ्या राजकीय जीवनात अनेक अपमान सहन केले कमीपणा घेतला तरी मी सहन केलं आम्हाला अनेकदा सांगितलं एक व झालं 1 मी रोखठोक बोलणारा कार्यकर्ता आहे मी होणार असेल तर हो म्हणतो नाही तर नाही सांगतो..
आपण नऊ मंत्री पदे घेतली यामध्ये सर्वच समाजातील घटकांना न्याय देण्याचे कार्य राष्ट्रवादीने केला आहे. सर्वसामाजिक घटकांना प्रतिनिधित्व देण्याचं काम या मंत्रिपदातून करण्यात आलेला आहे. यापुढेही अनेक पदे राष्ट्रवादीला मिळणार आहेत अनेक कार्यकर्त्यांना यातून न्याय मिळेल.
मी संपूर्ण राज्याचा दौरा करून मी माझी भूमिका समजावून सांगणार आहे. राष्ट्रवादीची मजबूत टीम आपल्याला तयार करायची आहे.
मी शरद पवारांना साष्टांग नमस्कार करून विनंती करतो की त्यांनी आम्हा सर्वांना आशीर्वाद द्यावा.