शबनम न्यूज : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार आदिती तटकरे यांना रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद दिलं जाईल अशी शक्यता वर्तवल्यापासूनच शिवसेनेच्या शिंदे गटाकडून सर्वाधिक विरोध होत आहे.
रायगड जिल्ह्यातील शिवसेना भाजपच्या सर्व आमदारांनी आदिती तटकरे यांना पालकमंत्री करण्यास विरोध दर्शवला असल्याचे आमदार भरत गोगावले यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं होतं. गोगावले यांनी आज (१२ जुलै) पुन्हा एकदा त्यांचं मत मांडलं. यावेळी गोगावले यांना प्रश्न विचारण्यात आला की, आदिती तटकरे यांनी याआधी पालकमंत्री म्हणून चांगलं काम केल्यामुळे त्यांना पुन्हा एकदा ही संधी द्यायला हवी, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत, यावर तुमचं मत काय? या प्रश्नावर गोगावले म्हणाले, त्यांनी चांगलं काम केलं असेल तर आम्ही काय वाईट काम करणार आहोत का? आम्ही त्यांच्यापेक्षा अधिक चांगलं काम करआमदार भरत गोगावले म्हणाले, पालकमंत्री म्हणून त्यांच्यापेक्षा (आदिती तटकरे) अधिक चांगलं काम करू.आम्हाला गेल्या १५ वर्षांचा आमदारकीचा अनुभव आहे. त्यामुळे आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊ आणि काम करू. रायगडमधल्या सहाच्या सहा आमदारांची, आम्हा सगळ्यांची एकच मागणी आहे की, रायगडचा पालकमंत्री हा भरत गोगावले असला पाहिजे.