शबनम न्युज | मुंबई
राज्याचे संसदेत पावसाळी अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनाचा आजचा पाचवा दिवस आहे. अधिवेशनात मणिपूर मुद्द्यावरून काँग्रेस आणि बीआरएसने मोदी सरकार विरोधात दोन वेगवेगळ्या अविश्वास प्रस्तावाच्या नोटिसा दिल्या होत्या. आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी त्या प्रस्तावाची नोटीस मंजूर केली आहे. जनतेचा सरकार वरील विश्वासाला तडाजात असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. पंतप्रधान मोदींनी मणिपूर वर बोलावे, अशी आमची इच्छा आहे. पण ते ऐकत नाहीत, म्हणून आम्ही अविश्वास प्रस्ताव आणण्याचा निर्णय घेतला आहे, असे काँग्रेसने म्हटले आहे.
मणिपूर मध्ये तीन मे पासून हिंसाचार सुरू आहे. मणिपूर मधील हिंसाचाराच्या मुद्द्यावरून पावसाळी अधिवेशनात गदारोळ सुरू आहे. विरोधी पक्ष पंतप्रधान मोदींनी बोलण्यासाठी आणि या मुद्द्यावर सभागृहात सविस्तर चर्चा करण्याची मागणी करत आहेत. गृहमंत्री अमित शहा यांच्या उत्तरानुसार सरकार चर्चेसाठी तयार आहे. मात्र, मोदी बोलायला तयार नाहीत. काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी सरकार विरोधातील अविश्वास प्रस्तावाची सूचना लोकसभेत मंजूर झाली आहे. प्रस्तावाच्या सूचनेला सभागृहातील आवश्यक 50 सदस्यांचा पाठिंबा मिळाला आहे. त्यांनी सकाळी नऊ ला लोकसभेत महासचिवांच्या कार्यालयात अविश्वास प्रस्तावाची सूचना दिली होती.