समृद्धी महामार्गावर अपघातांचे सत्र सुरूच आहे. बुलढाण्यात झालेल्या अपघाताला एक महिना उलटत नाही तोवर समृद्धीवर दुसरा अपघात झाला आहे. या अपघातात तब्बल १६ जणांचे प्राण गेले आहेत. समृद्धी महामार्गाचे तिसऱ्या टप्प्यातील काम युद्धपातळीवर सुरू आहे. रात्रकालीन काम सुरू असताना शहापूर सरंळाबे येथे क्रेन आणि स्लॅब कोसळून १६ जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी अपघाताची दखल राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी घेतली असून त्यासंदर्भात त्यांनी ट्वीट केलं आहे.
शहापूर तालुक्यात समृद्धी महामार्गावर पुलाचे काम सुरू असताना एक दुर्घटना होऊन काही मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुःखद आणि मनाला वेदना देणारी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
या घटनेत 3 कामगार जखमी झाले.…— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 1, 2023
Advertisement
शहापूर तालुक्यातील सरलंबे येथे समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्यातील काम सुरु असताना घडलेल्या दुर्घटनेत मजुरांचा झालेला मृत्यू अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी आहे. पुलाचं काम सुरू असताना गर्डर मशिन आणि क्रेन खाली कोसळल्यानं हा अपघात झाला. बचावकार्य युद्धपातळीवर राबवलं जात आहे.…
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) August 1, 2023
Advertisement